शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...नाही सहन होत या व्यथा!

By admin | Updated: June 2, 2017 01:50 IST

शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया गहिवरला.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘काळ्या आईच्या उदरात पेरलंय बान-बियानं अन् निसर्गाकडे लागलंय बाचं मन... पावसाचं करतोय ध्यान, आता सारी कोरडीच माती नाही, दिसत बियांचं मोड, नाही दिसत हिरवं शिवार, शेत पडलं ओसाड... किती सांगू शेतकरी बाबाच्या कथा, नाही सहन होत या व्यथा...’ अशा एक ना अनेक प्रकारच्या कविता, शायरी, शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया गहिवरला. देशाच्या अन् राज्याच्या इतिहासात प्रथमच बळीराजाने संप पुकारल्यामुळे शहरवासीयांचे हाल झाले आणि सरकारी यंत्रणाही हादरून गेली. या संपाबाबत अनेकांनी आपली मते सोशल मीडियावर मुक्तपणे मांडली. काहींनी शेतकऱ्यांचा संप गरजेचा होता, सरकारने अंत बघितला अन् संयमांचा बांध अखेर फुटला, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या तर काहींनी मात्र शेतकऱ्यांनी संप केला यास हरकत नाही, मात्र शेतमालाची केलेली नासाडी बघवत नसल्याचेही अधोरेखित केले. गुरुवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर नेटिझन्स सक्रिय झाले होते. दिवसभर नेटिझन्सनी शहरासह जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या बातम्या, छायाचित्रे, चित्रफित सोशल मीडियावर पोस्ट केले. अनेकांनी बळीराजाचे व जनतेचे आभारही मानले. तसेच विविध ग्रुपवर शेतकऱ्यांचे छायाचित्र पोस्ट केले जात होते. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याचा संदेशही यामध्ये लिहिण्यात आला होता. एकूणच दिवसभर सोशल मीडियावर शेतकरी संपाची चर्चा रंगली होती.