शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

...नाही सहन होत या व्यथा!

By admin | Updated: June 2, 2017 01:50 IST

शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया गहिवरला.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘काळ्या आईच्या उदरात पेरलंय बान-बियानं अन् निसर्गाकडे लागलंय बाचं मन... पावसाचं करतोय ध्यान, आता सारी कोरडीच माती नाही, दिसत बियांचं मोड, नाही दिसत हिरवं शिवार, शेत पडलं ओसाड... किती सांगू शेतकरी बाबाच्या कथा, नाही सहन होत या व्यथा...’ अशा एक ना अनेक प्रकारच्या कविता, शायरी, शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया गहिवरला. देशाच्या अन् राज्याच्या इतिहासात प्रथमच बळीराजाने संप पुकारल्यामुळे शहरवासीयांचे हाल झाले आणि सरकारी यंत्रणाही हादरून गेली. या संपाबाबत अनेकांनी आपली मते सोशल मीडियावर मुक्तपणे मांडली. काहींनी शेतकऱ्यांचा संप गरजेचा होता, सरकारने अंत बघितला अन् संयमांचा बांध अखेर फुटला, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या तर काहींनी मात्र शेतकऱ्यांनी संप केला यास हरकत नाही, मात्र शेतमालाची केलेली नासाडी बघवत नसल्याचेही अधोरेखित केले. गुरुवारी मध्यरात्रीपासून सोशल मीडियावर नेटिझन्स सक्रिय झाले होते. दिवसभर नेटिझन्सनी शहरासह जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या बातम्या, छायाचित्रे, चित्रफित सोशल मीडियावर पोस्ट केले. अनेकांनी बळीराजाचे व जनतेचे आभारही मानले. तसेच विविध ग्रुपवर शेतकऱ्यांचे छायाचित्र पोस्ट केले जात होते. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याचा संदेशही यामध्ये लिहिण्यात आला होता. एकूणच दिवसभर सोशल मीडियावर शेतकरी संपाची चर्चा रंगली होती.