शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

भाज्या महागल्याने सर्वसामान्य हवालदिल

By admin | Updated: June 23, 2017 00:28 IST

नाशिक : जून महिना संपत आला असून, दडून बसलेल्या पावसामुळे भाज्यांचा पुरवठा कमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जून महिना संपत आला असून, दडून बसलेल्या पावसामुळे भाज्यांचा पुरवठा कमी झाला असून, भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मुबलक भाज्या बाजारात कधी दाखल होतील व दर आवाक्यात कधी येतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत असून, भाव कमी झाले नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी आंदोलन, त्याच दरम्यान झालेल्या तुरळक पावसामुळे भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार झाले होते.आंदोलन संपल्यानंतर पुरेसा माल बाजारपेठेत दाखल होईपर्यंत भाज्यांचे भाव स्थिर व्हायला थोडा वेळ लागला. आता शेतकरी, व्यापारी, नागरिक साऱ्यांनाच दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. हवा तसा पाऊस पडत नसल्याने शेतातील उभी पिके वाळू लागली आहेत तर दुसरीकडे मधुनच एखाद दिवस धुवाधार पाऊस होत असल्याने काढलेल्या भाज्या सडून नुकसान सहन करावे लागत आहे. दमदार पाऊस पडल्यानंतर भाज्यांचे भाव स्थिर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.