शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भाज्या महागल्याने सर्वसामान्य हवालदिल

By admin | Updated: June 23, 2017 00:28 IST

नाशिक : जून महिना संपत आला असून, दडून बसलेल्या पावसामुळे भाज्यांचा पुरवठा कमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जून महिना संपत आला असून, दडून बसलेल्या पावसामुळे भाज्यांचा पुरवठा कमी झाला असून, भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मुबलक भाज्या बाजारात कधी दाखल होतील व दर आवाक्यात कधी येतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत असून, भाव कमी झाले नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी आंदोलन, त्याच दरम्यान झालेल्या तुरळक पावसामुळे भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार झाले होते.आंदोलन संपल्यानंतर पुरेसा माल बाजारपेठेत दाखल होईपर्यंत भाज्यांचे भाव स्थिर व्हायला थोडा वेळ लागला. आता शेतकरी, व्यापारी, नागरिक साऱ्यांनाच दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. हवा तसा पाऊस पडत नसल्याने शेतातील उभी पिके वाळू लागली आहेत तर दुसरीकडे मधुनच एखाद दिवस धुवाधार पाऊस होत असल्याने काढलेल्या भाज्या सडून नुकसान सहन करावे लागत आहे. दमदार पाऊस पडल्यानंतर भाज्यांचे भाव स्थिर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.