शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

सामर्थ्यशाली झालेल्यांच्याच अहिंसेला असते किंमत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत ...

नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत नसते. त्यातून कधीच काही सध्या करता येऊ शकत नाही, हे सावरकरांचे तत्त्वज्ञान आपल्याला आजच्या काळातही किती सार्थ होते, हे समजू शकते, असे प्रख्यात अभिनेते आणि सावरकर विचार प्रसारक शरद पोंक्षे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने आयोजित शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफून करण्यात आले. सावरकरांना वेगळ्या प्रकारची लोकशाही अभिप्रेत होती. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षांची सज्ञान होईपर्यंत लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वयम अधिकार ज्ञात करून दिल्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, असे सावरकर यांचे मत होते. सामर्थ्यशाली देशाच्याच अहिंसेला किंमत असते, हे तत्त्वज्ञान इंदिरा गांधीच्या काळात ज्यावेळेला भारताने अणुबॉम्ब तयार केला, त्यानंतरची सर्व युद्धे आपण जिंकली यातूनही अधोरेखित झाल्याचे पोंक्षे यांनी नमूद केले. आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीचे बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे असल्याचे सावरकर यांचे विचार होते. सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरू केला आहे, असेही पोंक्षे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत - प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्रा.डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. शनिवारी अशोक टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रख्यात प्रकाशक रामदास भटकळ यांचे व्याख्यान रंगणार आहे.

इन्फो

सावरकरांनी राष्ट्रहितासाठी केलेल्या सूचना

१ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्य बलाढ्य करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून अणुबॉम्ब तयार करावेत, त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांनी ज्ञान मिळवावे.

२ देशाची सुरक्षा करणारे सैन्यबळ आणि पोलीस यांना उत्तम पगार दिल्यास आपली बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत बनेल. तसेच तरुण पिढी लष्करात जायला तयार राहील.

३ पिढी घडविणारे जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात. त्यांना सुद्धा उत्तम पगार दिल्यास पुढील पिढ्या चांगल्या घडतील.

फोटो

२८शरद पोंक्षे