शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
2
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
3
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
4
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
5
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
6
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
7
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
9
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
10
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
11
Astro Tip: सकाळी झोपून उठल्यावर म्हणा 'हा' पॉवरफुल मंत्र; २१ दिवसात मार्गी लागेल काम!
12
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
13
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
14
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
15
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
17
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
18
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
19
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
20
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

सामर्थ्यशाली झालेल्यांच्याच अहिंसेला असते किंमत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत ...

नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत नसते. त्यातून कधीच काही सध्या करता येऊ शकत नाही, हे सावरकरांचे तत्त्वज्ञान आपल्याला आजच्या काळातही किती सार्थ होते, हे समजू शकते, असे प्रख्यात अभिनेते आणि सावरकर विचार प्रसारक शरद पोंक्षे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने आयोजित शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफून करण्यात आले. सावरकरांना वेगळ्या प्रकारची लोकशाही अभिप्रेत होती. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षांची सज्ञान होईपर्यंत लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वयम अधिकार ज्ञात करून दिल्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, असे सावरकर यांचे मत होते. सामर्थ्यशाली देशाच्याच अहिंसेला किंमत असते, हे तत्त्वज्ञान इंदिरा गांधीच्या काळात ज्यावेळेला भारताने अणुबॉम्ब तयार केला, त्यानंतरची सर्व युद्धे आपण जिंकली यातूनही अधोरेखित झाल्याचे पोंक्षे यांनी नमूद केले. आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीचे बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे असल्याचे सावरकर यांचे विचार होते. सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरू केला आहे, असेही पोंक्षे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत - प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्रा.डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. शनिवारी अशोक टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रख्यात प्रकाशक रामदास भटकळ यांचे व्याख्यान रंगणार आहे.

इन्फो

सावरकरांनी राष्ट्रहितासाठी केलेल्या सूचना

१ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्य बलाढ्य करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून अणुबॉम्ब तयार करावेत, त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांनी ज्ञान मिळवावे.

२ देशाची सुरक्षा करणारे सैन्यबळ आणि पोलीस यांना उत्तम पगार दिल्यास आपली बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत बनेल. तसेच तरुण पिढी लष्करात जायला तयार राहील.

३ पिढी घडविणारे जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात. त्यांना सुद्धा उत्तम पगार दिल्यास पुढील पिढ्या चांगल्या घडतील.

फोटो

२८शरद पोंक्षे