शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सामर्थ्यशाली झालेल्यांच्याच अहिंसेला असते किंमत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत ...

नाशिक : आपण लष्करीदृष्ट्या सर्व सामर्थ्यशाली असल्याशिवाय आपल्या हातात अहिंसा शोभून दिसत नाही. किंबहुना दुबळ्या माणसांच्या अहिंसेला जगात किंमत नसते. त्यातून कधीच काही सध्या करता येऊ शकत नाही, हे सावरकरांचे तत्त्वज्ञान आपल्याला आजच्या काळातही किती सार्थ होते, हे समजू शकते, असे प्रख्यात अभिनेते आणि सावरकर विचार प्रसारक शरद पोंक्षे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने आयोजित शब्द जागर भेटूयात घरोघरी या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफून करण्यात आले. सावरकरांना वेगळ्या प्रकारची लोकशाही अभिप्रेत होती. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी जन्माला आलेली पिढी पहिली पिढी २१ वर्षांची सज्ञान होईपर्यंत लोकशाही नको होती. या सज्ञान पिढीला शिक्षणातून ज्ञान आणि स्वयम अधिकार ज्ञात करून दिल्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, असे सावरकर यांचे मत होते. सामर्थ्यशाली देशाच्याच अहिंसेला किंमत असते, हे तत्त्वज्ञान इंदिरा गांधीच्या काळात ज्यावेळेला भारताने अणुबॉम्ब तयार केला, त्यानंतरची सर्व युद्धे आपण जिंकली यातूनही अधोरेखित झाल्याचे पोंक्षे यांनी नमूद केले. आपण ज्ञानी झाल्याने सुशिक्षित होत नाही. लोकशाहीचे बीज रुजविण्यासाठी आपण सुशिक्षित होणे गरजेचे असल्याचे सावरकर यांचे विचार होते. सावानाने अतिशय उत्तम उपक्रम सुरू केला आहे, असेही पोंक्षे यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत - प्रास्ताविक सांस्कृतिक सचिव प्रा.डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे यांनी आभार मानले. शनिवारी अशोक टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रख्यात प्रकाशक रामदास भटकळ यांचे व्याख्यान रंगणार आहे.

इन्फो

सावरकरांनी राष्ट्रहितासाठी केलेल्या सूचना

१ देशस्वतंत्र झाल्यानंतर पहिले आपले सैन्य बलाढ्य करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून अणुबॉम्ब तयार करावेत, त्यासाठी विदेशातील शास्त्रज्ञांकडून आपल्या शास्त्रज्ञांनी ज्ञान मिळवावे.

२ देशाची सुरक्षा करणारे सैन्यबळ आणि पोलीस यांना उत्तम पगार दिल्यास आपली बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत बनेल. तसेच तरुण पिढी लष्करात जायला तयार राहील.

३ पिढी घडविणारे जे शिक्षक आहेत ते खऱ्या अर्थाने पुढची पिढी तयार करण्याचे काम करतात. त्यांना सुद्धा उत्तम पगार दिल्यास पुढील पिढ्या चांगल्या घडतील.

फोटो

२८शरद पोंक्षे