शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

नोटाबंदीचा निर्णय नसबंदीसारखाच

By admin | Updated: January 6, 2017 01:10 IST

शरद पवारांची गुगली : मोदी.. गडी बोलायला हुश्शार, म्हणे, मी राजकारणात आणले !

 नाशिक : मोदी.. गडी बोलायला फार हुशार... म्हणे, पवारांनी बोट धरून मला राजकारणात आणलं. ऐकून म्हटलं मेलो आपण ! भाषण असं ठोकून देतोय की, समोरच्याला वाटतं नक्कीच छाती ५६ इंचाची आहे, असे चिमटे काढत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविणारे निर्णय घेतले की जनता मतपेटीतून उत्तर दिल्यावाचून राहत नाही. केंद्र सरकारच्या नोटबंदीचा निर्णयही असाच असून, सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे ही नोटबंदी आहे की नसबंदी हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत शेतकरी मेळाव्यात बोलताना पवार यांनी मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले. ते म्हणाले, नोटाबंदीची घोषणा करताना ‘५० दिन मुझे दे दो’ असं मोदी म्हणाले होते. पन्नास दिवस उलटून गेले तरी जनतेचे हाल संपलेले नाहीत. आता 'त्यांना कोणत्या चौकात उभं करायचं? कोणता आसूड हाती घ्यायचा. चाबूूक घ्यायचा की आसूड ओढायचा? शिवसेनेचे लोक त्यांचे सहकारी आहेत. काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. म्हटलं बाबा तुम्ही सगळे गळ्यात गळे घालणारे लोक आहात. तुम्हीच ठरवा काय ते ! संसदेजवळच्या बँकेत २४ हजार रुपये काढायला माणूस पाठवला तर १० हजारच मिळाले. तेव्हा आमच्यासारख्या खासदारांची ही गत असेल तर चलनटंचाईने तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल हे समजण्यासारखे आहे, असे सांगून पवार म्हणाले, सरकारची पुढची पायरी सोनं आहे. आमच्या आई-बहिणींच्या गळ्यात किती सोनं आहे याची चौकशी करणार आहेत. म्हणजे आम्ही लोकसभेचे अखेरचे सभासद ठरलो...पुन्हा कधी लोक आम्हाला संसदेत पाठवणार नाहीत. आमचीच अशी दैना झाली म्हणजे काय करायचं? कुणी बोलायचं? पवारांच्या या गुगलीवर एकच हशा पिकला. नोटबंदीवर आज जनता गप्प असली तरी ती मतपेटीतून व्यक्त होईल. काँग्रेस सरकारने आणीबाणीचा घेतलेला निर्णय असाच अंगलट आला होता. पुढे भुईसपाट व्हावे लागले, ही आठवणही पवार यांनी करून दिली. शेतकऱ्यांच्या मालाला कधी भाव मिळाला तर दिल्लीत त्याची चर्चा होते पण आता तर कुठल्याही पिकाला भाव राहिलेला नाही. खर्चही वसूल होत नाही. शेतीच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आंधळेपणाची भूमिका घेतली आहे, असा आरोप करून वैतागलेली जनता हा संताप निवडणूकीत दिसून आल्यावाचून राहणार नाही, असेही पवार म्हणाले.याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विनायकराव पाटील, मेळाव्याचे आयोजक माजी आमदार दिलीप बनकर यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसांच्या व्यथा मांडल्या. व्यासपीठावर आमदार हेमंत टकले, नरहरी झिरवळ, दीपिका चव्हाण, रवींद्र पगार, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यास जिल्हातील कांदा ऊत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)