शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
4
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
5
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
6
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
7
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
8
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
9
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
10
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
11
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
12
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
13
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
14
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
15
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
16
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
17
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
19
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
20
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुले, बाल कामगारांप्रती शिक्षण विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:41 IST

शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प प्रयत्नशील आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे अशा बाल कामगार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक पाठ्यपुस्तक ांसोबतच शाळाबाह्य मुलांची वास्तविक माहिती उपलब्ध होत नसल्याने हजारो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहात असल्याने शिक्षण विभागाची बाल कामगार व शाळाबाह्य मुलांप्रती असलेली उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देबाल कामगार प्रकल्पाचा आरोप : शैक्षणिक पाठ्यपुस्तक ांसाठी करावी लागते विनवणी

नाशिक : शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प प्रयत्नशील आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे अशा बाल कामगार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक पाठ्यपुस्तक ांसोबतच शाळाबाह्य मुलांची वास्तविक माहिती उपलब्ध होत नसल्याने हजारो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहात असल्याने शिक्षण विभागाची बाल कामगार व शाळाबाह्य मुलांप्रती असलेली उदासीनता दिसून येत आहे.जुन्या कायद्यानुसार धोकादायक आणि असुरक्षित अशी विभागणी करत १८ उद्योग आणि ५७ व्यवसाय प्रक्रियांमध्ये काम करण्यास बालकांना बंदी करण्यात आली होती. नव्या कायद्यानुसार ही व्याप्ती वाढविण्यात आली असून, धोकादायक किंवा असुरक्षित अशी विभागणी न करता शाळाबाह्य तसेच कुठल्याही प्रकारचे काम करणाऱ्या १४ वर्षांआतील बालकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा बालकांचा शोध घेण्याचे आवाहन आता राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पासमोर आहे.परंतु जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची वास्तविक माहिती वेळेत मिळू शकत नसल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचितराहतात.शिक्षण विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने बाल कामगार प्रकल्पाला जिल्हा स्तरावर समाजकार्य महाविद्यालयांची मदत घेऊन बाल कामगारापर्यंत तसेच शाळाबाह्य मुलांपर्यंत पोहोचावे लागत असल्याने डिसेंबरपर्यंतही सर्वेक्षणाचे काम करावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासावर होत आहे.३0 ते ४0 केंद्रे सुरू होण्याची शक्यताबाल कामगारांसाठी गेल्या वर्षी जिल्ह्यात ३० विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू होती. परंतु यावर्षी अद्याप सर्वेक्षणच सुरू असल्याने केवळ ६ प्रशिक्षण केंद्रेच सुरू होऊ शकली असून यातील बहूतांश केंद्रे मालेगाव भागात आहेत. ही संख्या यावर्षीही ३० ते ४० केंद्रांपर्यंत जाण्याची शक्यता राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक जयप्रकाश देशमुख यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी किमान ५० बालकांसाठी केंद्र सुरू करता येत होते. केंद्र सरकारने ही अट शिथिल केल्याने जिल्हा परिसरात ठिकठिकाणी किमान २० बालकांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchildren's dayबालदिन