शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

खासगी वाहनचालकांचा घुमतोय पिंपळगाव बसस्थानकात आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:17 IST

स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या वेळेवर सोडण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देआर्थिक भुर्दंड । राज्य परिवहन महामंडळाचे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष

पिंपळगाव बसवंत : येथील स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या वेळेवर सोडण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.येथील स्थानकात बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे संधी साधून खासगी वाहनचालक स्थानकात एन्ट्री घेतात. ‘चलो नाशिक, चलो नाशिक’ची आरोळी देत प्रवासी पळवतात. बसेसच उपलब्ध नसल्याने अनेकांना नाइलाजाने खासगी वाहनांमध्ये जीवघेणा प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या एसटीची अवस्था तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करतानादेखील कठीण आहे.निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तालुक्याला जाणाऱ्या बसेसचे तीन तेरा वाजले आहेत. या बसेस कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे बेकायदा प्रवासी वाहतूक करणाºया खासगी वाहनांचा प्रवाशांना आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत असून, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिरुद मिरवणारी एसटी ग्रामीण भागात प्रवाशांसाठी बिनभरवाशाची ठरत आहे.पिंपळगाव शहरातील नोकरदारांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटी बस हा चांगला पर्याय आहे. मात्र अनेकदा वेळेवर गाडीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मासिक पासधारक प्रवासी, शेतकरी, नोकरदार व सवलतीच्या दराने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांना नाहक फटका बसतो. त्यांच्याकडे खासगी वाहतूक करणाºया वाहनांशिवाय दुसरा पर्याय नसतो. शहरातून जवळपास हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र वेळेवर बस नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करून इच्छित स्थळ गाठावे लागते. त्यामुळे नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करून त्या वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी जोर प्रवाशांनी केली आहे.पिंपळगाव स्थानकात वेळेवर बस येत नाही व टोल नाक्यावरील अवाच्या सव्वा टोल वसुलीमुळे वर्षभरात आगाराला १२ लाख रु पयांचा टोल भरावा लागला आहे. उत्पन्न कमी आणि टोलची रक्कम अधिक यामुळे महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून ग्राहकसेवा पुरविण्यावर भर देण्याची गरज आहे. बसस्थानकातून प्रवासी घेऊन जाण्याला जबाबदार कोण, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- मयूर गावडे, सामाजिक कार्यकर्ते पिंपळगाव बसवंतबस वेळेवर येत नसल्याने नाइलाजाने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. बसेस वेळेवर आल्या आणि त्या अद्ययावत असला तर प्रवास सुखकारक होईल.

- रमेश गायकवाड, प्रवासी

टॅग्स :Bus Driverबसचालक