शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

समित्यांच्या बैठकांना लागेना मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST

नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. ...

नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. साहित्य संमेलन दीड महिन्यावर आले असताना त्यातील अवघ्या तीन समित्यांच्या बैठका झाल्या असून तब्बल ३६ समित्या अद्यापही केवळ कागदावरच राहिल्या आहेत.

साहित्य संमेलन नाशिकला होण्याबाबतची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून विविध विषयांच्या समित्या गठीत करायच्या असून त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नावे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबाबत सांस्कृतिक ग्रुप असलेल्या विविध समाजमाध्यमांवर त्यासाठीचे आवाहन करून नाशिकचे संमेलन हे सर्वांचे कार्य असल्याने अधिकाधिक इच्छुकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनांना नाशिककरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत त्यांना आवडणाऱ्या विभागासाठी काम करण्याची तयारी दाखवली. तर, काही नावे आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने त्यात समाविष्ट करून समित्यांचे गठन करण्यात येणार होते. तसेच या सर्व समित्यांचे बैठका, कामकाज नियोजनानुसार व्हावे, यासाठी त्यांचे समन्वय राखण्यासाठी विश्वास ठाकूर यांचीदेखील त्यावर नियुक्ती करण्यात आली. ठाकूर यांनी व्यवस्थितपणे याद्या तयार करून अंतिम मंजुरीसाठी त्या याद्या लोकहितवादी मंडळाकडे सूपुर्द केल्या. त्यानंतर सर्व समित्यांमधील कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांचे विचार समजून घेऊन त्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यातील केवळकवी कट्टा, स्मरणिका, ग्रंथदिंडी या ३ समित्यांच्या बैठका झाल्या. उर्वरित ३६ समित्यांची पहिली बैठकदेखील झालेली नाही.

मग गठन कशासाठी?

समित्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे विचारच ऐकून घ्यायचे नसतील तर या समित्या नक्की कशासाठी गठीत झाल्या, की केवळ दिखाव्यासाठीच त्यांचे गठन करण्यात आले आहे, असा प्रश्न अनेक समित्यांमधील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. भविष्यात कोणत्याही नियोजनात त्रुटी राहून जर काही समस्या निर्माण झाली, तर ऐनवेळी कार्यकर्त्यांची अनुपलब्धता होण्याचीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.