शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

समित्यांच्या बैठकांना लागेना मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST

नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. ...

नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. साहित्य संमेलन दीड महिन्यावर आले असताना त्यातील अवघ्या तीन समित्यांच्या बैठका झाल्या असून तब्बल ३६ समित्या अद्यापही केवळ कागदावरच राहिल्या आहेत.

साहित्य संमेलन नाशिकला होण्याबाबतची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून विविध विषयांच्या समित्या गठीत करायच्या असून त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नावे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबाबत सांस्कृतिक ग्रुप असलेल्या विविध समाजमाध्यमांवर त्यासाठीचे आवाहन करून नाशिकचे संमेलन हे सर्वांचे कार्य असल्याने अधिकाधिक इच्छुकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनांना नाशिककरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत त्यांना आवडणाऱ्या विभागासाठी काम करण्याची तयारी दाखवली. तर, काही नावे आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने त्यात समाविष्ट करून समित्यांचे गठन करण्यात येणार होते. तसेच या सर्व समित्यांचे बैठका, कामकाज नियोजनानुसार व्हावे, यासाठी त्यांचे समन्वय राखण्यासाठी विश्वास ठाकूर यांचीदेखील त्यावर नियुक्ती करण्यात आली. ठाकूर यांनी व्यवस्थितपणे याद्या तयार करून अंतिम मंजुरीसाठी त्या याद्या लोकहितवादी मंडळाकडे सूपुर्द केल्या. त्यानंतर सर्व समित्यांमधील कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांचे विचार समजून घेऊन त्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यातील केवळकवी कट्टा, स्मरणिका, ग्रंथदिंडी या ३ समित्यांच्या बैठका झाल्या. उर्वरित ३६ समित्यांची पहिली बैठकदेखील झालेली नाही.

मग गठन कशासाठी?

समित्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे विचारच ऐकून घ्यायचे नसतील तर या समित्या नक्की कशासाठी गठीत झाल्या, की केवळ दिखाव्यासाठीच त्यांचे गठन करण्यात आले आहे, असा प्रश्न अनेक समित्यांमधील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. भविष्यात कोणत्याही नियोजनात त्रुटी राहून जर काही समस्या निर्माण झाली, तर ऐनवेळी कार्यकर्त्यांची अनुपलब्धता होण्याचीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.