शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

समित्यांच्या बैठकांना लागेना मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:16 IST

नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. ...

नाशिक : मार्च महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आयोजकांच्या वतीने तब्बल ३९ समित्यांचे गठन करण्यात आले होते. साहित्य संमेलन दीड महिन्यावर आले असताना त्यातील अवघ्या तीन समित्यांच्या बैठका झाल्या असून तब्बल ३६ समित्या अद्यापही केवळ कागदावरच राहिल्या आहेत.

साहित्य संमेलन नाशिकला होण्याबाबतची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून विविध विषयांच्या समित्या गठीत करायच्या असून त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नावे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याबाबत सांस्कृतिक ग्रुप असलेल्या विविध समाजमाध्यमांवर त्यासाठीचे आवाहन करून नाशिकचे संमेलन हे सर्वांचे कार्य असल्याने अधिकाधिक इच्छुकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनांना नाशिककरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत त्यांना आवडणाऱ्या विभागासाठी काम करण्याची तयारी दाखवली. तर, काही नावे आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने त्यात समाविष्ट करून समित्यांचे गठन करण्यात येणार होते. तसेच या सर्व समित्यांचे बैठका, कामकाज नियोजनानुसार व्हावे, यासाठी त्यांचे समन्वय राखण्यासाठी विश्वास ठाकूर यांचीदेखील त्यावर नियुक्ती करण्यात आली. ठाकूर यांनी व्यवस्थितपणे याद्या तयार करून अंतिम मंजुरीसाठी त्या याद्या लोकहितवादी मंडळाकडे सूपुर्द केल्या. त्यानंतर सर्व समित्यांमधील कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका घेऊन त्यांचे विचार समजून घेऊन त्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यातील केवळकवी कट्टा, स्मरणिका, ग्रंथदिंडी या ३ समित्यांच्या बैठका झाल्या. उर्वरित ३६ समित्यांची पहिली बैठकदेखील झालेली नाही.

मग गठन कशासाठी?

समित्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे विचारच ऐकून घ्यायचे नसतील तर या समित्या नक्की कशासाठी गठीत झाल्या, की केवळ दिखाव्यासाठीच त्यांचे गठन करण्यात आले आहे, असा प्रश्न अनेक समित्यांमधील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. भविष्यात कोणत्याही नियोजनात त्रुटी राहून जर काही समस्या निर्माण झाली, तर ऐनवेळी कार्यकर्त्यांची अनुपलब्धता होण्याचीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.