शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केले आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य विषयातील गुणांमुळे उत्तीर्ण होता येणार आहे.

या नियमांमुळे सीबीएससी दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याने पालकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सीबीएसई दहावीसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांनुसार, कौशल्य विकासअंतर्गत कॉम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, फायनांशियल मार्केटिंग यासारखे विविध १७ कौशल्य आधारित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात रिटेल, सिक्युरिटी, ऑटोमोटिव्ह, टुरिझम, बँकिंग अँड इन्शुरन्स, हेल्थ केअर आदी विषयांचाही समावेश आहे. त्यापैकी एक विषय निवडून त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांचा लाभ होणार आहे. सीबीएससीने काही वर्षांपूर्वी बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार परीक्षा होणार असून त्याचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

सीबीएसई शाळा - १८

--

काय आहेत नवीन नियम

सीबीएसईसाठी दोन भाषा (इंग्रजी, हिंदी), विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र विषय हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला कौशल्य आधारित अतिरिक्त पर्यायी विषय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पर्यायी सहाव्या कौशल्य विषयात उत्तीर्ण असल्यास ते गुण ग्राह्य धरून पास केले जाणार आहे. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयांची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने यंदा मदत होणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती सीबीएससीचे शिक्षक व प्राचार्यांनी दिली आहे.

--

कौशल्य विषयाची होणार मदत

सीबीएससी बोर्डाच्या नियमानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. एखाद्या विषयात विद्यार्थी अपेक्षित गुण मिळवून शकला नाही तर त्याला या नियमानुसार चांगली मदत होणार आहे.

- प्रशांत जाधव, पालक

--

विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य आधारित विषयातील गुणांचा आधार होऊन तो उत्तीर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थी नापास होणार नाही. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असला तरी त्याचे वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्याला एखाद्या विषयात ६० गुणांपैकी २० गुण अंतर्गत दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही निर्णयाचे स्वागत होत असल्याचे विविध सीबीएसई स्कूलच्या प्राचार्यांनी सांगितले.