शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

सीबीएसई दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केले आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य विषयातील गुणांमुळे उत्तीर्ण होता येणार आहे.

या नियमांमुळे सीबीएससी दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याने पालकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सीबीएसई दहावीसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांनुसार, कौशल्य विकासअंतर्गत कॉम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, फायनांशियल मार्केटिंग यासारखे विविध १७ कौशल्य आधारित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात रिटेल, सिक्युरिटी, ऑटोमोटिव्ह, टुरिझम, बँकिंग अँड इन्शुरन्स, हेल्थ केअर आदी विषयांचाही समावेश आहे. त्यापैकी एक विषय निवडून त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांचा लाभ होणार आहे. सीबीएससीने काही वर्षांपूर्वी बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार परीक्षा होणार असून त्याचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

सीबीएसई शाळा - १८

--

काय आहेत नवीन नियम

सीबीएसईसाठी दोन भाषा (इंग्रजी, हिंदी), विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र विषय हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला कौशल्य आधारित अतिरिक्त पर्यायी विषय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पर्यायी सहाव्या कौशल्य विषयात उत्तीर्ण असल्यास ते गुण ग्राह्य धरून पास केले जाणार आहे. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयांची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने यंदा मदत होणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती सीबीएससीचे शिक्षक व प्राचार्यांनी दिली आहे.

--

कौशल्य विषयाची होणार मदत

सीबीएससी बोर्डाच्या नियमानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. एखाद्या विषयात विद्यार्थी अपेक्षित गुण मिळवून शकला नाही तर त्याला या नियमानुसार चांगली मदत होणार आहे.

- प्रशांत जाधव, पालक

--

विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य आधारित विषयातील गुणांचा आधार होऊन तो उत्तीर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थी नापास होणार नाही. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असला तरी त्याचे वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्याला एखाद्या विषयात ६० गुणांपैकी २० गुण अंतर्गत दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही निर्णयाचे स्वागत होत असल्याचे विविध सीबीएसई स्कूलच्या प्राचार्यांनी सांगितले.