शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सीबीएसई दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू ...

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियम आणि कौशल्य आधारित विषय लागू केले आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य विषयातील गुणांमुळे उत्तीर्ण होता येणार आहे.

या नियमांमुळे सीबीएससी दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नसल्याने पालकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सीबीएसई दहावीसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांनुसार, कौशल्य विकासअंतर्गत कॉम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, फायनांशियल मार्केटिंग यासारखे विविध १७ कौशल्य आधारित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात रिटेल, सिक्युरिटी, ऑटोमोटिव्ह, टुरिझम, बँकिंग अँड इन्शुरन्स, हेल्थ केअर आदी विषयांचाही समावेश आहे. त्यापैकी एक विषय निवडून त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या बेस्ट ऑफ फाईव्ह नियमांचा लाभ होणार आहे. सीबीएससीने काही वर्षांपूर्वी बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार परीक्षा होणार असून त्याचा विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.

--

सीबीएसई दहावीतील विद्यार्थी - १५७०

सीबीएसई शाळा - १८

--

काय आहेत नवीन नियम

सीबीएसईसाठी दोन भाषा (इंग्रजी, हिंदी), विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र विषय हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला कौशल्य आधारित अतिरिक्त पर्यायी विषय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला पर्यायी सहाव्या कौशल्य विषयात उत्तीर्ण असल्यास ते गुण ग्राह्य धरून पास केले जाणार आहे. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयांची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने यंदा मदत होणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची माहिती सीबीएससीचे शिक्षक व प्राचार्यांनी दिली आहे.

--

कौशल्य विषयाची होणार मदत

सीबीएससी बोर्डाच्या नियमानुसार दहावीतील एकही विद्यार्थी नापास होणार नाही. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. एखाद्या विषयात विद्यार्थी अपेक्षित गुण मिळवून शकला नाही तर त्याला या नियमानुसार चांगली मदत होणार आहे.

- प्रशांत जाधव, पालक

--

विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य आधारित विषयातील गुणांचा आधार होऊन तो उत्तीर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थी नापास होणार नाही. त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असला तरी त्याचे वर्ष वाया जाणार नाही. विद्यार्थ्याला एखाद्या विषयात ६० गुणांपैकी २० गुण अंतर्गत दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही निर्णयाचे स्वागत होत असल्याचे विविध सीबीएसई स्कूलच्या प्राचार्यांनी सांगितले.