शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:21 IST

पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो.

नाशिक : पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी नागरिकांबरोबरच पर्यटकांची गर्दी अधिक होत असते. पण ही स्थळे मुख्यत: धोकादायक असतात त्यात पावसाळ्यात या स्थळांवरील स्थिती अधिक गंभीर बनत असते. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक ठरतात.दरम्यान, दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात होणारा पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कार्यरत असणे गरजेचे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील महिन्यातच सर्वच शासकीय कार्यालयांना तसे आदेशही दिले गेले असतांनी आपापल्या परिक्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता जाणवत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असेलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. पण काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. सदर स्थळांवर काही प्रमाणात पोलिसांची गस्त असून, सुद्धा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन या विभागांच्या जबाबदाºया निश्चित करून दिल्या आहेत, पण पर्यटकांची गर्दी बघता अशा ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाला मर्यादा येत आहेत. तसेच काही पर्यटनस्थळांवर ‘नो सेल्फी झोन’चे फलकही दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी थेट घसरणीच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याची मजल वाढली आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.‘नो सेल्फी झोन’ची ठिकाणेरामकुंड, तपोवन, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, चामरलेणी, नवश्या गणपती, संत गाडगे महाराज पूल, व्हिक्टोरिया पूल, चित्ते पूल, चोपडा लॉन्स पूल, गंगापूर धरण, आशावाडी किल्ला, रामशेज किल्ला, दुगारवाडी धबधबा, पहिने परिसर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, वाघेरा घाट, हरिहर गड, अशोका धबधबा, कसारा घाट, घाटनदेवी, वैतरणा धरण, भावली धरण, दारणा धरण आदी.सूचनांकडे केले जाते दुर्लक्षसेल्फी झोन, नो सेल्फी झोन, धोकादायक ठिकाणे, अरुंद रस्ता, वाहतुकीस अडचण, कुठल्या बाजूने जावे, कुठून जाऊ नये, अशी माहिती देणारे फलक काही ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांना धोकादायक स्थळांची माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अशा ठिकाणी तळीरामांची संख्याही जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे असे पर्यटक जिवाची तमा न बाळगता धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी, फोटो काढत असतात.

टॅग्स :Selfieसेल्फीDamधरणriverनदीRainपाऊस