शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:21 IST

पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो.

नाशिक : पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी नागरिकांबरोबरच पर्यटकांची गर्दी अधिक होत असते. पण ही स्थळे मुख्यत: धोकादायक असतात त्यात पावसाळ्यात या स्थळांवरील स्थिती अधिक गंभीर बनत असते. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक ठरतात.दरम्यान, दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात होणारा पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कार्यरत असणे गरजेचे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील महिन्यातच सर्वच शासकीय कार्यालयांना तसे आदेशही दिले गेले असतांनी आपापल्या परिक्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता जाणवत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असेलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. पण काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. सदर स्थळांवर काही प्रमाणात पोलिसांची गस्त असून, सुद्धा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन या विभागांच्या जबाबदाºया निश्चित करून दिल्या आहेत, पण पर्यटकांची गर्दी बघता अशा ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाला मर्यादा येत आहेत. तसेच काही पर्यटनस्थळांवर ‘नो सेल्फी झोन’चे फलकही दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी थेट घसरणीच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याची मजल वाढली आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.‘नो सेल्फी झोन’ची ठिकाणेरामकुंड, तपोवन, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, चामरलेणी, नवश्या गणपती, संत गाडगे महाराज पूल, व्हिक्टोरिया पूल, चित्ते पूल, चोपडा लॉन्स पूल, गंगापूर धरण, आशावाडी किल्ला, रामशेज किल्ला, दुगारवाडी धबधबा, पहिने परिसर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, वाघेरा घाट, हरिहर गड, अशोका धबधबा, कसारा घाट, घाटनदेवी, वैतरणा धरण, भावली धरण, दारणा धरण आदी.सूचनांकडे केले जाते दुर्लक्षसेल्फी झोन, नो सेल्फी झोन, धोकादायक ठिकाणे, अरुंद रस्ता, वाहतुकीस अडचण, कुठल्या बाजूने जावे, कुठून जाऊ नये, अशी माहिती देणारे फलक काही ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांना धोकादायक स्थळांची माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अशा ठिकाणी तळीरामांची संख्याही जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे असे पर्यटक जिवाची तमा न बाळगता धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी, फोटो काढत असतात.

टॅग्स :Selfieसेल्फीDamधरणriverनदीRainपाऊस