शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:21 IST

पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो.

नाशिक : पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी नागरिकांबरोबरच पर्यटकांची गर्दी अधिक होत असते. पण ही स्थळे मुख्यत: धोकादायक असतात त्यात पावसाळ्यात या स्थळांवरील स्थिती अधिक गंभीर बनत असते. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक ठरतात.दरम्यान, दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात होणारा पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कार्यरत असणे गरजेचे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील महिन्यातच सर्वच शासकीय कार्यालयांना तसे आदेशही दिले गेले असतांनी आपापल्या परिक्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता जाणवत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असेलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. पण काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. सदर स्थळांवर काही प्रमाणात पोलिसांची गस्त असून, सुद्धा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन या विभागांच्या जबाबदाºया निश्चित करून दिल्या आहेत, पण पर्यटकांची गर्दी बघता अशा ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाला मर्यादा येत आहेत. तसेच काही पर्यटनस्थळांवर ‘नो सेल्फी झोन’चे फलकही दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी थेट घसरणीच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याची मजल वाढली आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.‘नो सेल्फी झोन’ची ठिकाणेरामकुंड, तपोवन, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, चामरलेणी, नवश्या गणपती, संत गाडगे महाराज पूल, व्हिक्टोरिया पूल, चित्ते पूल, चोपडा लॉन्स पूल, गंगापूर धरण, आशावाडी किल्ला, रामशेज किल्ला, दुगारवाडी धबधबा, पहिने परिसर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, वाघेरा घाट, हरिहर गड, अशोका धबधबा, कसारा घाट, घाटनदेवी, वैतरणा धरण, भावली धरण, दारणा धरण आदी.सूचनांकडे केले जाते दुर्लक्षसेल्फी झोन, नो सेल्फी झोन, धोकादायक ठिकाणे, अरुंद रस्ता, वाहतुकीस अडचण, कुठल्या बाजूने जावे, कुठून जाऊ नये, अशी माहिती देणारे फलक काही ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांना धोकादायक स्थळांची माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अशा ठिकाणी तळीरामांची संख्याही जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे असे पर्यटक जिवाची तमा न बाळगता धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी, फोटो काढत असतात.

टॅग्स :Selfieसेल्फीDamधरणriverनदीRainपाऊस