शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

उड्डाणपुलाला विरोध नाही, मग रस्त्यांना का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

नाशिक : सिडकोतील उड्डाणपुलाला भाजपचा कधीही विरोध नव्हता. महापालिका आयुक्तांनी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रसंगी विकास कामे रद्द करू ...

नाशिक : सिडकोतील उड्डाणपुलाला भाजपचा कधीही विरोध नव्हता. महापालिका आयुक्तांनी आर्थिक स्थिती चांगली नसल्याने प्रसंगी विकास कामे रद्द करू असे सांगितल्यानंतर मी अन्य प्रभागातही विकासकामे व्हावीत यासाठीच उड्डाणपुल रद्द करा आणि ती रक्कम अन्य प्रभागातील विकासकामांसाठी खर्च करावी असे सांगितले, यात काय चुकले, असा प्रश्न करीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. सिडकोतील उड्डाणपुलास विरोध केल्याचा आरोप शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी केल्यानंतर भाजप आणि महापौर यांच्यात जुंपली आहे. उड्डाणपुलाच्या वादासंदर्भात महापौर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना भूमिका मांडली.

प्रश्न- सिडकोतील उड्डाणपुलाला विरोध करण्याचे कारण काय?

कुलकर्णी - आरोप करण्याआधी संबंधितांनी आधी बाजू समजून घेतली पाहिजे. मायको सर्कल आणि सिडकोत उड्डाण पूल व्हावा यासाठी भाजपनेच मंजुरी दिली आहे. हे उड्डाणपुल बांधायचे नसते तर त्याला महासभेत आणि पुढे स्थायी समितीच्या बैठकीत देखील मंजुरी दिली नसती. त्यामुळे सिडकोवासीयांच्या विषयी आकस असल्याचा प्रश्न अत्यंत गैरलागू आहे. हे पूल मंजूर झाल्यानंतर देखील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे होत नाहीत, अशी ओरड असताना आयुक्तांनी प्रसंगी विकासकामे रद्द करू असे मत व्यक्त केले. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांत अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे विकासकामेच रद्द करायची असतील तर उड्डाणपूल रद्द करा आणि सर्व पक्षांतील नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे करा, अशी भूमिका मी मांडली. यात गैर काहीच नव्हते.

प्रश्न- सिडकोतील पूल तीन वर्षांत पूर्ण करायचा असल्याने सर्व निधी आताच खर्च होणार नव्हता. मग विरोध कशासाठी?

कुलकर्णी - शहराचा विकास आराखडा १९९३ मध्ये मंजूर झाला. त्यावेळी जे रस्ते मंजूर झाले, असे अनेक रस्ते अजूनही तयार झालेले नाहीत. असे रिंगरोड विकसित झाले तर नागरी वसाहती, व्यापार वाढून महापालिकेलाच फायदा होणार आहे. सातपूरसह अन्य खेड्यांमध्ये जाऊन बघा, तेथे चालण्यासाठी रस्ते नाहीत, मग हे रस्ते केव्हा करणार, हा प्रश्न आहे. ज्या प्रमाणे उड्डाणपुलासाठी एकाच वर्षात निधी लागणार नाही, तसेच डीपी रोडसाठी एकाच वर्षात रक्कम देण्याची गरज नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्याची कामे सप्टेंबर महिन्यानंतरच होऊ शकतात. त्यामुळे रस्त्यांना देखील विरोध करण्याचे कारण नाही.

प्रश्न - भाजप, सेनेचे आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत पातळीवर सुरू झाले आहेत.

कुलकर्णी - मी कोणावरही व्यक्तिगत आरोप केलेले नाहीत. कारण आरोप - प्रत्यारोपापेक्षा चर्चेमुळे प्रश्न सुटतात असे माझे मत आहे. बडगुजर यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी आरोप केल्याचे शल्य त्यांना असेल तर त्यांच्यावर अशी वेळ का आणली याचे आत्मपरीक्षण देखील संबंधितांनी केले पाहिजे.