शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या दावणीला नाही चारा ... दुष्काळाची घोषणा कागदावर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 17:17 IST

मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) राजस्थान मधून मानोरीत चाºयाच्या शोधात आलेले असल्याने उंट बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती.

ठळक मुद्देमानोरी : वानर, मोर, हरीण, उंट अन्न पाण्याच्या शोधार्थ गावात

मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) राजस्थान मधून मानोरीत चाºयाच्या शोधात आलेले असल्याने उंट बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती.त्याच बरोबर वानर सुद्धा अन्न पाण्याच्या शोधात मानोरीत मानवी वस्तीकडे भरकटले असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी एक वानर थेट मानवी वस्तीत घुसले होते. विशेष बाब म्हणजे हे वानर आपली तहान भागविण्यासाठी व्याकूळ झालेले होते. वानराने आपली तहान भागविण्यासाठी थेट माणसांच्या घोळक्यात उभे राहिल्याचे दिसून आले.यंदा पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात सर्वत्र वेळेच्या आधीच दुष्काळाच्या झळा जाणवण्यास सुरु वात झाली आहे. शासनाने दुष्काळाची घोषणा केवळ कागदावरच केलेली असून तीन महिने उलटून गेलेले असून प्रत्यक्षता अमलबजावणी होत नसल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात असून केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अमलबजावणी करण्याची मागणी शेतकºयाकडून होत आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, नेउरगाव आदि परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याचे पिक घेण्यास सुरु वात केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याणे मक्याचे उत्पादन घटून चारा देखील उपलब्ध न झाल्याने मागील दोन महिन्यापासून शेतकरी आपल्या जनावरांना महागडा चारा विकत आणून जणावरे सांभाळत आहे.मुखेड परिसरात मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र असून उस तोड सुद्धा सुरु असून मुखेड आणि सत्यगाव परिसरात मागील महिनाभरापासून देशमाने, मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, सत्यगाव, भिंगारे, नेउरगाव, जळगाव नेउर, वाकद, मानोरी खुर्द येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या जनावरासाठी दररोज संध्याकाळी ऊसाच्या बांड्या खरेदी करण्यासाठी येत असतात.नांदगाव तालुका तसेच मनमाड भागातील मेंढपाळ येवला तालुक्यात दाखल झालेले आहे. यात एका कळपात सुमारे दोनशे ते तीनशे मेंढ्या असून असे १०० हून अधिक कळप येवला तालुक्यात दाखल झालेले आहे.शेतकºयांच्या जनावरांबरोबर वन्य प्राण्यांची देखील अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असताना दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक आणि मुखेड परिसरात हरणांची संख्या मोठ्या दिसून येत आहे. शेतकºयांनी थोडाफार आपल्या जनावरांना केलेला हिरवा घास हरणांकडून रात्रीच्या वेळी फस्त करण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी हरणांकडून करण्यात येत आहे.ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेले सार्वजनिक जनावरांचे पाणवठे कोरडे पडत असल्याने वानर, मोर तसेच विविध प्रकारच्या दुर्मिळ जातीचे पक्षी देखील पाणी पिण्यासाठी मानवीवस्तीकडे आगेचूक करत आहे. त्यांमुळे वनविभागाने दुष्काळी भागात वन्यप्राण्यांसाठी चारा छावण्या आणि पाणवठे सुरु करण्याची मागणी होवू लागली आहे.