शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

जनावरांच्या दावणीला नाही चारा ... दुष्काळाची घोषणा कागदावर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 17:17 IST

मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) राजस्थान मधून मानोरीत चाºयाच्या शोधात आलेले असल्याने उंट बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती.

ठळक मुद्देमानोरी : वानर, मोर, हरीण, उंट अन्न पाण्याच्या शोधार्थ गावात

मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) राजस्थान मधून मानोरीत चाºयाच्या शोधात आलेले असल्याने उंट बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती.त्याच बरोबर वानर सुद्धा अन्न पाण्याच्या शोधात मानोरीत मानवी वस्तीकडे भरकटले असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी एक वानर थेट मानवी वस्तीत घुसले होते. विशेष बाब म्हणजे हे वानर आपली तहान भागविण्यासाठी व्याकूळ झालेले होते. वानराने आपली तहान भागविण्यासाठी थेट माणसांच्या घोळक्यात उभे राहिल्याचे दिसून आले.यंदा पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात सर्वत्र वेळेच्या आधीच दुष्काळाच्या झळा जाणवण्यास सुरु वात झाली आहे. शासनाने दुष्काळाची घोषणा केवळ कागदावरच केलेली असून तीन महिने उलटून गेलेले असून प्रत्यक्षता अमलबजावणी होत नसल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात असून केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अमलबजावणी करण्याची मागणी शेतकºयाकडून होत आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, नेउरगाव आदि परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याचे पिक घेण्यास सुरु वात केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याणे मक्याचे उत्पादन घटून चारा देखील उपलब्ध न झाल्याने मागील दोन महिन्यापासून शेतकरी आपल्या जनावरांना महागडा चारा विकत आणून जणावरे सांभाळत आहे.मुखेड परिसरात मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र असून उस तोड सुद्धा सुरु असून मुखेड आणि सत्यगाव परिसरात मागील महिनाभरापासून देशमाने, मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, सत्यगाव, भिंगारे, नेउरगाव, जळगाव नेउर, वाकद, मानोरी खुर्द येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या जनावरासाठी दररोज संध्याकाळी ऊसाच्या बांड्या खरेदी करण्यासाठी येत असतात.नांदगाव तालुका तसेच मनमाड भागातील मेंढपाळ येवला तालुक्यात दाखल झालेले आहे. यात एका कळपात सुमारे दोनशे ते तीनशे मेंढ्या असून असे १०० हून अधिक कळप येवला तालुक्यात दाखल झालेले आहे.शेतकºयांच्या जनावरांबरोबर वन्य प्राण्यांची देखील अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असताना दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक आणि मुखेड परिसरात हरणांची संख्या मोठ्या दिसून येत आहे. शेतकºयांनी थोडाफार आपल्या जनावरांना केलेला हिरवा घास हरणांकडून रात्रीच्या वेळी फस्त करण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी हरणांकडून करण्यात येत आहे.ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेले सार्वजनिक जनावरांचे पाणवठे कोरडे पडत असल्याने वानर, मोर तसेच विविध प्रकारच्या दुर्मिळ जातीचे पक्षी देखील पाणी पिण्यासाठी मानवीवस्तीकडे आगेचूक करत आहे. त्यांमुळे वनविभागाने दुष्काळी भागात वन्यप्राण्यांसाठी चारा छावण्या आणि पाणवठे सुरु करण्याची मागणी होवू लागली आहे.