शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने जातपंचायतविरोधी कायदा केला. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणि जातपंचायत मूठमाती अभियानाचा त्यासाठी पाठपुरावा होता आणि ...

चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने जातपंचायतविरोधी कायदा केला. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणि जातपंचायत मूठमाती अभियानाचा त्यासाठी पाठपुरावा होता आणि एका ताज्या घटनेने महाराष्ट्र हादरल्याने प्रसिद्धी माध्यमांचा राज्य सरकारवर दबाव होता. खरे तर या कायद्यास नाशिकमधील घटना कारणीभूत हेाती. नाशिक येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणाने वरून एका गर्भवती महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या घटनेमागे जातपंचायतींचा दबाव असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले. त्यातून जातपंचायत मूठमाती अभियान सुरू झाले. जात पंचायतींच्या मनमानीची शेकडो प्रकरणे समोर आली आहेत. उकळत्या तेलात हात घालणे, पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा देणे, नववधूची कौमार्याची चाचणी घेणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, वाळीत टाकणे अशा शिक्षा जातपंचायतींकडून होत आहेत. हे सर्व उघड झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी हा विषय लावून धरला. न्यायालयाने सरकारला याविषयी कायदा बनविण्यास सांगितले. जातपंचायतींच्या वाढत्या अघोरी घटना लक्षात घेऊन राज्य सरकारने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला. ३ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर तो अमलात आला.

असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. एका बाजूने हे आश्वासक असले तरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मात्र सरकार उदासीन आहे. याचे कारण म्हणजे ११० गुन्हे दाखल झाले, परंतु निष्कर्षाप्रत कुठलेच प्रकरण गेले नाही. याचे कारण म्हणजे सरकारने कायद्यासंदर्भातील आवश्यक ते नियमच तयार केलेले नाही. त्यामुळे पेालीस यंत्रणा अनभिज्ञ आहे. त्यामुळे तक्रार दाखल करताना अडचणी येतात. हे नियम करावेत यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासन दरबारी पाठपुरावा केला. गृह विभागासोबत एक बैठकही झाली. मात्र अंमलबजावणीसाठी सरकारने काही योजना आखल्या नाहीत व प्रयत्नही केले नाहीत. पोलिसांची प्रशिक्षण शिबिरे घेणे, अत्यंत अवश्यक आहेे. कायद्याची शासकीय कमिटी अजून तयार झाली नाही. पीडितांना निवारा मिळावा, तात्पुरते पुनर्वसन व्हावे, आर्थिक मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील आहे. केवळ विविध जातींची एकगठ्ठा मते गमवायची नाही, म्हणून राज्य सरकारकडून बाळगली जाणारी उदासीनता चिंताजनक आहे.

- कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान

---- गेस्टरुमसाठी मुलाखत