शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मनपा : पारंपरिक कामांमध्येच रस, अंतर्गत कलह‘ध्येयनामा’चे भाजपाला विस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:19 IST

महापालिकेत तब्बल ६६ जागा जिंकत सत्तारूढ झालेल्या भाजपाला निवडणूक काळात जाहीर केलेल्या ‘ध्येयनामा’तील आपल्याच वचनांचे विस्मरण झाले आहे.

ठळक मुद्देप्रस्तावही तयार होऊ शकलेला नाहीनेहमीच्याच संकल्पना मांडण्यात आल्यायोजनेला चालना देण्यात यश नाही

नाशिक : महापालिकेत तब्बल ६६ जागा जिंकत सत्तारूढ झालेल्या भाजपाला निवडणूक काळात जाहीर केलेल्या ‘ध्येयनामा’तील आपल्याच वचनांचे विस्मरण झाले आहे. सत्तेत येऊन दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी एकही नावीन्यपूर्ण योजनेला चालना तर दूरच, साधा प्रस्तावही तयार होऊ शकलेला नाही. याउलट, रस्ते विकासासारख्या पारंपरिक कामांमध्येच अधिक स्वारस्य दाखविले जात आहे. त्यातच पहिल्यांदा एकहाती सत्ता प्राप्त झाल्याने नेत्यांमधील महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या असून, अंतर्गत कलहाने पक्षाला ग्रासले आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने आपला ‘ध्येयनामा’ जाहीर केला होता. त्यासाठी भाजपाच्या संकेतस्थळावर नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याला शहरातील ४३ हजार ६७७ नागरिकांनी प्रतिसाद दिला होता.नागरिकांच्या सूचनांवरून प्रकाशित करण्यात आलेल्या ध्येयनाम्यात नाना-नानी पार्क उभारणार, ग्रीन जीम, उड्डाणपूल, शहरात सीसीटीव्ही, जलवाहिन्या बदलणे, महिलांचे बचत गट सुरू करणे अशा नेहमीच्याच संकल्पना मांडण्यात आल्या होत्या. शिवाय, मनपा रुग्णालयात जन्मास येणाºया मुलीच्या नावे पाच हजार रुपये डिपॉजीट करणे, महिलांच्या अडचणींसाठी समुपदेशन केंद्र, विकासकामांच्या निविदांच्या अंतिम देयकांसंदर्भात सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, सॅनेटरी नॅपकिनची डिस्पोजल सिस्टीम बसविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रूफ असेल तर घरपट्टीवर असणारी पाच टक्के सवलत दहा टक्केकरणे, कौशल विकास केंद्र उभारणे, वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी पूजन, आनंदवल्ली ते मानूर घाटापर्यंत स्वच्छतेचे स्वतंत्र केंद्र, गोदाकाठी सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा प्रबोधिनी, शहीद स्मारके उभारणी या काही नावीन्यपूर्ण योजनांचाही समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर, नाशिकच्या औद्योगिक वाढीसाठी स्वतंत्र औद्योगिक प्राधीकरण करणे, नाशिकमधून राष्टय व आंतरराष्टÑीय विमान सेवा सुरू करणे, स्वंतत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि सहाशे खाटांचे रुग्णालय सुरू करणे, कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करणे, गुंडगिरीला आळा घालून अवैध धंद्यांचा बंदोबस्त करणे, नाशिक शहरात पोलिसांची गस्त वाढवणे, अशा महापालिकेच्या अखत्यारित नसलेल्या अनेक अफलांतून योजना त्यात मांडण्यात आल्या होत्या. नाशिकला आयटी हब तसेच देश-विदेशांतील उद्योगांसाठी आंतरराष्टÑीय कन्व्हकेशन सेंटर उभे करणार, महापालिकेची पर्यावरणपूरक बससेवा तसेच ई-रिक्षा सुरू करणे, तपोवनात पाचशे खोल्यांचे पर्यटन विकास तसेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी पर्यटन केंद्र अशा महत्त्वाकांक्षी योजनांचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजनांचे वचन भाजपाने दिले परंतु, आता सत्तेत येऊन वर्ष पूर्ण व्हायची वेळ आली तरी यातील एकही योजनेला चालना देण्यात सत्ताधाºयांना यश आलेले नाही.