शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निफाड परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:19 IST

शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

निफाड : शहर परिसरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम असून, पूर्व भागातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणातून १४,२३४ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूरस्थिती आली आहे. परतीच्या पावसाने शेतकºयांचे नुकसान केले आहे. या पावसामुळे द्राक्षबागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागायतदार शेतकरी चिंतित झाले आहे.मागील आठवड्यात सूर्यनारायणाने निफाडकरांना भाजून काढले होते. प्रचंड उकाड्याने निफाडकर हैराण झाले होते. रविवारी व सोमवारी संततधार पावसाने निफाड व परिसरात हजेरी लावल्याने दिलासा दिला होता; मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.मंगळवारी दुपारी १२ वाजेनंतर सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरू होता. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. पावसामुळे शहर परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा दिवसभर जोर असल्याने अनेक शेतात पाणी साचले आहे. ढगाळ वातावरण व सततचा पावसामुळे द्राक्ष व सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्या द्राक्षबागा फुलोºयाच्या टप्प्यात असून, ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे द्राक्षमण्याची गळ होत आहे. यामुळे द्राक्षाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. हा पाऊस द्राक्षांना उपयोगी नसल्याने द्राक्षांवर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फुलोºयातील गळ वाढल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. या पावसामुळे सोंगणीसाठी आलेल्या सोयाबीनची पाने गळून पडण्यास प्रारंभ झाल्याने सोयाबीन खराब होण्याचा धोका वाढला आहे. सोयाबीनचे दाणे काळसर पडतात की काय अशी चिंंता व्यक्त केली जात आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक चिंतित झाला आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पूर्व भागातील गंगापूर, दारणा, कडवा, वालदेवी, पालखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी आणि कादवा, बाणगंगेला पूर आला आहे. तसेच हे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात येत असल्याने नांदूरमधमेश्वरमधून विसर्ग सुरू आहे. एकूण एकूण ५ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी ६ वाजता ५ दरवाजे उघडण्यात आले. यातून २५५४८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आहे.