शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:23 IST

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबागलाणमध्ये संततधार : हरणबारी धरणातून विसर्ग; मोसम, हत्ती, कान्हेरी नदीला पूर

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.शहरासह तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्प, दसाणे, पठावे लघुप्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, भडाणे, जायखेडा, ब्राह्मणपाडे, आसखेडा, द्याने, मोसम खोरे, काटवन, आरम खोºयातील डांगसौंदाणे, कंधाण,े चौंधाणे तसेच पूर्व बागलाणमधील अजमीर सौंदाणे ,देवळाणे सुराणे वायगाव, वीरगाव, केरसाने परिसरात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. हरणबारी धरणातून ९२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मोसम नदीला पूर आला आहे. सोमपूर, जायखेडा, आसखेडा, वाघळे, राजपूरपांडे गावांचा फरशीपूल पाण्याखाली गेल्याने वाघळे, राजपूरपांडे, मेंढीपाडे, वाडीपिसोळ, पिसोळ, नांदिन, तांदूळवाडी, भडाणे, पिंपळकोठे या गावांचा संपर्क तुटला आहे. दसाणे, पठावे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने कान्हेरी व हत्ती नदीला पूर आला आहे. काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर केळझर मध्यम प्रकल्प ,जाखोड, दोधेश्वर, तळवाडे, बोढरी, बिलपुरी, शेमळी, रातीर ,कºहे येथील लघुप्रकल्प अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असून केळझर वगळता सर्वच प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे आरम, करंजाडी, दोध्याड, सुकेड या नद्या कोरड्याठाक आहेत. मुल्हेर-अंतापूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ढासळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.या संततधार पावसामुळे द्राक्षासह टमाटा, मका, मिरची ,कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांची अर्ली छाटणी झाली आहे. बागा फुलोºयावर असून, कुज, डावनी, पूलगळ सारखे प्रादुर्भाव निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच हंगाम हाताशी येईल की नाही या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे. अन्य पिकांवरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले आहे.