शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:23 IST

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबागलाणमध्ये संततधार : हरणबारी धरणातून विसर्ग; मोसम, हत्ती, कान्हेरी नदीला पूर

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.शहरासह तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्प, दसाणे, पठावे लघुप्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, भडाणे, जायखेडा, ब्राह्मणपाडे, आसखेडा, द्याने, मोसम खोरे, काटवन, आरम खोºयातील डांगसौंदाणे, कंधाण,े चौंधाणे तसेच पूर्व बागलाणमधील अजमीर सौंदाणे ,देवळाणे सुराणे वायगाव, वीरगाव, केरसाने परिसरात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. हरणबारी धरणातून ९२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मोसम नदीला पूर आला आहे. सोमपूर, जायखेडा, आसखेडा, वाघळे, राजपूरपांडे गावांचा फरशीपूल पाण्याखाली गेल्याने वाघळे, राजपूरपांडे, मेंढीपाडे, वाडीपिसोळ, पिसोळ, नांदिन, तांदूळवाडी, भडाणे, पिंपळकोठे या गावांचा संपर्क तुटला आहे. दसाणे, पठावे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने कान्हेरी व हत्ती नदीला पूर आला आहे. काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर केळझर मध्यम प्रकल्प ,जाखोड, दोधेश्वर, तळवाडे, बोढरी, बिलपुरी, शेमळी, रातीर ,कºहे येथील लघुप्रकल्प अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असून केळझर वगळता सर्वच प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे आरम, करंजाडी, दोध्याड, सुकेड या नद्या कोरड्याठाक आहेत. मुल्हेर-अंतापूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ढासळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.या संततधार पावसामुळे द्राक्षासह टमाटा, मका, मिरची ,कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांची अर्ली छाटणी झाली आहे. बागा फुलोºयावर असून, कुज, डावनी, पूलगळ सारखे प्रादुर्भाव निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच हंगाम हाताशी येईल की नाही या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे. अन्य पिकांवरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले आहे.