शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

ओझर विमानतळावर नाइट लँडिंगला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:16 IST

ओझर : येथील विमानतळावर नाइट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय ...

ओझर : येथील विमानतळावर नाइट लँडिंग करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानतळांशी कनेक्ट होण्याबरोबरच नाशिकहून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणेही शक्य होणार आहेत. या सुविधेमुळे ओझर विमानतळावरून पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तसेच मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीचा भार लक्षात घेता त्याला नाशिक हा व्यवहार्य पर्याय ठरणार आहे.

ओझर विमानतळावर नाइट लँडिंग तसेच इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, प्रवासी विमान वाहतुकीसाठी नाइट लँडिंग किंवा टेक ऑफसाठी डीजीसीएचे प्रमाणपत्र बंधनकारक असते. ओझर विमानतळ एचएएलच्या अखत्यारित असल्याने एचएएलकडे हे प्रमाणपत्र नाही. एचएएलने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि सोयी-सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यानुसार डीजीसीएच्या अधिकार्‍यांनी फेब्रुवारी महिन्यात ओझर विमानतळाची पाहणी केली. अखेर सर्व चाचण्यांनंतर डीजीसीएने ओझर नाइट लँडिंगला परवानगी दिली. यामुळे नाशिक देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले जाणार आहे.

इन्फो

मुंबईला सक्षम पर्याय?

उडान योजनेमुळे मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक वाढल्याने अनेकदा टाइम स्लॉट देताना विलंब होतो. सद्य:स्थितीत मुंबई विमानतळावरून दररोज तब्बल ९००हून अधिक विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होते. हा सारा व्याप आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाचे काम या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईला पर्यायी विमानतळ कोणते, यासाठी गांभीर्याने विचार सुरू आहे. ओझर विमानतळावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास मुंबईला सक्षम पर्याय म्हणून हे विमानतळ उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे हवाई वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

इन्फो :

कंपन्यांना आर्थिक लाभ शक्य

मुंबईनंतर १५० किलोमीटरच्या परिघात अन्य विमानतळ नाही. सध्या अहमदाबाद विमानतळ मुंबईला पर्याय म्हणून वापरले जाते. मुंबई-अहमदाबादचे हवाई अंतर २४० मैल आहे. त्या तुलनेत मुंबईपासून नाशिकचे हवाई अंतर केवळ ९७.८ मैल आहे. त्यामुळे मुंबई-ओझर प्रवासासाठी ०.३० मिनिटे आणि ७५० लिटर इंधन लागते. याच तुलनेत अहमदाबादला ०.४६ मिनिटांचा वेळ आणि २००० लिटर इंधन लागते. त्यामुळे ओझरचा पर्याय फायदेशीर ठरेल. ओझरला येताना आणि जाताना प्रवाशी वाहतुकीतूनही विमान कंपन्यांना आर्थिक लाभही होऊ शकेल.