शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

शहरातील नाले सफाईबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:48 IST

मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.

ठळक मुद्देमालेगाव। पावसाळ्यात साचते घरांमध्ये पाणी

मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील आझादनगर रस्ते, गांधी कपडा मार्केट, जमहूर नाला, दत्तनगर, पवारवाडी, मिल्लतनगर अशा विविध भागातील नाल्यांची सफाई करण्यात येत असे मात्र यंदा पावसाळा संपत आला असूनही गटारीची नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. परिणामी सर्वच नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक, कचरा साचल्याने अल्प प्रमाणातही पाऊस झाला तरी गटारीचे पाणी रस्त्यांवर येते. त्यामुळे अनेक भागात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो आहे.कुठलेही गांभीर्य मनपास नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छतेअभावी नाल्यांमध्ये घाणीचे थर साचून राहतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक साथीचे आजार पसरत आहेत. शहरातील सामान्य रुग्णालय, मनपा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या महासभेतही लोकप्रतिनिधींकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे गटारीच्या नाल्यालगत पवारवाडी परिसरातील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे संसारोपयोगी वस्तू, धान्य अशा विविध प्रकारच्या ९९ घरांचे ५४ लाख ७८ हजारांचे नुकसान झाले आहे. मनपातर्फे दोन-दिवस त्याच नाल्यांची सफाई करण्यात आली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नाल्यांची तातडीने स्वच्छता करणे गरजेचे बनले आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडे होऊनही संबंधित विभागावर कारवाई करण्याचे धारिष्ट्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखविली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.