शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नाले सफाईबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:48 IST

मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.

ठळक मुद्देमालेगाव। पावसाळ्यात साचते घरांमध्ये पाणी

मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील आझादनगर रस्ते, गांधी कपडा मार्केट, जमहूर नाला, दत्तनगर, पवारवाडी, मिल्लतनगर अशा विविध भागातील नाल्यांची सफाई करण्यात येत असे मात्र यंदा पावसाळा संपत आला असूनही गटारीची नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. परिणामी सर्वच नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक, कचरा साचल्याने अल्प प्रमाणातही पाऊस झाला तरी गटारीचे पाणी रस्त्यांवर येते. त्यामुळे अनेक भागात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो आहे.कुठलेही गांभीर्य मनपास नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छतेअभावी नाल्यांमध्ये घाणीचे थर साचून राहतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक साथीचे आजार पसरत आहेत. शहरातील सामान्य रुग्णालय, मनपा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या महासभेतही लोकप्रतिनिधींकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे गटारीच्या नाल्यालगत पवारवाडी परिसरातील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे संसारोपयोगी वस्तू, धान्य अशा विविध प्रकारच्या ९९ घरांचे ५४ लाख ७८ हजारांचे नुकसान झाले आहे. मनपातर्फे दोन-दिवस त्याच नाल्यांची सफाई करण्यात आली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नाल्यांची तातडीने स्वच्छता करणे गरजेचे बनले आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडे होऊनही संबंधित विभागावर कारवाई करण्याचे धारिष्ट्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखविली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.