शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शहरातील नाले सफाईबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:48 IST

मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.

ठळक मुद्देमालेगाव। पावसाळ्यात साचते घरांमध्ये पाणी

मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील आझादनगर रस्ते, गांधी कपडा मार्केट, जमहूर नाला, दत्तनगर, पवारवाडी, मिल्लतनगर अशा विविध भागातील नाल्यांची सफाई करण्यात येत असे मात्र यंदा पावसाळा संपत आला असूनही गटारीची नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. परिणामी सर्वच नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक, कचरा साचल्याने अल्प प्रमाणातही पाऊस झाला तरी गटारीचे पाणी रस्त्यांवर येते. त्यामुळे अनेक भागात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो आहे.कुठलेही गांभीर्य मनपास नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छतेअभावी नाल्यांमध्ये घाणीचे थर साचून राहतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक साथीचे आजार पसरत आहेत. शहरातील सामान्य रुग्णालय, मनपा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या महासभेतही लोकप्रतिनिधींकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे गटारीच्या नाल्यालगत पवारवाडी परिसरातील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे संसारोपयोगी वस्तू, धान्य अशा विविध प्रकारच्या ९९ घरांचे ५४ लाख ७८ हजारांचे नुकसान झाले आहे. मनपातर्फे दोन-दिवस त्याच नाल्यांची सफाई करण्यात आली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नाल्यांची तातडीने स्वच्छता करणे गरजेचे बनले आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडे होऊनही संबंधित विभागावर कारवाई करण्याचे धारिष्ट्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखविली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.