शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

जायकवाडीला जाणाऱ्या पाणीप्रश्नाला बगल

By admin | Updated: July 14, 2016 01:50 IST

सप्टेंबरनंतर निर्णय : यंदाही भीती कायम

 नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसामुळे गोदावरी, कादवा, दारणा या नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकहून जवळपास साडेतीन, तर अहमदनगरहून दोन टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे झेपावल्यामुळे या पाण्याचे आॅडिट करून तशी नोंद प्रशासनाने ठेवावी, या लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुर्लक्ष करीत, धरणांच्या पाण्याचे नियोजन सप्टेंबरअखेर केले जात असल्याचे सांगून, एकप्रकारे यंदाही मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याबाबतची भीती अधोरेखित केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी अगोदर हा मुद्दा उपस्थित करून महाजन यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, जवळपास पाच ते साडेपाच टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे रवाना झाले असून, अजून पावसाळा सुरू असल्याने भविष्यातही कदाचित पाणी सोडावे लागेल, त्यामुळे जिल्ह्णातून नेमके किती पाणी मराठवाड्याला जाते त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे, जेणे करून यंदा पुन्हा समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित झाल्यास जिल्ह्णाची बाजू संबंधित यंत्रणेसमोर मांडणे सोपे होणार आहे. असाच मुद्दा आमदार अनिल कदम यांनीही उपस्थित करून धरणाचे पाणी अन्यत्र सोडण्याऐवजी कालव्यांच्या माध्यमातून बंधारे, शेततळे भरून दिल्यास या पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होईल. तसेच डिसेंबर, जानेवारीपासून पाण्याची होणारी मागणी टाळता येईल, असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर गिरीश महाजन यांनी भाष्य करणे टाळले, मात्र त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या सर्वत्र चांगला व दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षासाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. मात्र धरणांच्या पाण्याचे नियोजन करताना त्याचे काही संकेत आहेत व सप्टेंबरमध्ये किती साठा शिल्लक आहे त्यावरच पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे जायकवाडीला नाशिक व नगरमधून जे पाणी गेल्या दोन-तीन दिवसांत सोडले गेले, त्याचा हिशेब ठेवला गेला तरी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याबाबत काय भूमिका घेते त्यावरच ते अवलंबून राहील, असे सांगितले.