शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

जायकवाडीला जाणाऱ्या पाणीप्रश्नाला बगल

By admin | Updated: July 14, 2016 01:50 IST

सप्टेंबरनंतर निर्णय : यंदाही भीती कायम

 नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसामुळे गोदावरी, कादवा, दारणा या नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकहून जवळपास साडेतीन, तर अहमदनगरहून दोन टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे झेपावल्यामुळे या पाण्याचे आॅडिट करून तशी नोंद प्रशासनाने ठेवावी, या लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुर्लक्ष करीत, धरणांच्या पाण्याचे नियोजन सप्टेंबरअखेर केले जात असल्याचे सांगून, एकप्रकारे यंदाही मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याबाबतची भीती अधोरेखित केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी अगोदर हा मुद्दा उपस्थित करून महाजन यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, जवळपास पाच ते साडेपाच टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे रवाना झाले असून, अजून पावसाळा सुरू असल्याने भविष्यातही कदाचित पाणी सोडावे लागेल, त्यामुळे जिल्ह्णातून नेमके किती पाणी मराठवाड्याला जाते त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे, जेणे करून यंदा पुन्हा समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित झाल्यास जिल्ह्णाची बाजू संबंधित यंत्रणेसमोर मांडणे सोपे होणार आहे. असाच मुद्दा आमदार अनिल कदम यांनीही उपस्थित करून धरणाचे पाणी अन्यत्र सोडण्याऐवजी कालव्यांच्या माध्यमातून बंधारे, शेततळे भरून दिल्यास या पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होईल. तसेच डिसेंबर, जानेवारीपासून पाण्याची होणारी मागणी टाळता येईल, असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर गिरीश महाजन यांनी भाष्य करणे टाळले, मात्र त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या सर्वत्र चांगला व दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षासाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. मात्र धरणांच्या पाण्याचे नियोजन करताना त्याचे काही संकेत आहेत व सप्टेंबरमध्ये किती साठा शिल्लक आहे त्यावरच पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे जायकवाडीला नाशिक व नगरमधून जे पाणी गेल्या दोन-तीन दिवसांत सोडले गेले, त्याचा हिशेब ठेवला गेला तरी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याबाबत काय भूमिका घेते त्यावरच ते अवलंबून राहील, असे सांगितले.