शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीला जाणाऱ्या पाणीप्रश्नाला बगल

By admin | Updated: July 14, 2016 01:50 IST

सप्टेंबरनंतर निर्णय : यंदाही भीती कायम

 नाशिक : सलग तीन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसामुळे गोदावरी, कादवा, दारणा या नद्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकहून जवळपास साडेतीन, तर अहमदनगरहून दोन टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे झेपावल्यामुळे या पाण्याचे आॅडिट करून तशी नोंद प्रशासनाने ठेवावी, या लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुर्लक्ष करीत, धरणांच्या पाण्याचे नियोजन सप्टेंबरअखेर केले जात असल्याचे सांगून, एकप्रकारे यंदाही मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याबाबतची भीती अधोरेखित केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी अगोदर हा मुद्दा उपस्थित करून महाजन यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, जवळपास पाच ते साडेपाच टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे रवाना झाले असून, अजून पावसाळा सुरू असल्याने भविष्यातही कदाचित पाणी सोडावे लागेल, त्यामुळे जिल्ह्णातून नेमके किती पाणी मराठवाड्याला जाते त्याची माहिती ठेवणे गरजेचे आहे, जेणे करून यंदा पुन्हा समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा उपस्थित झाल्यास जिल्ह्णाची बाजू संबंधित यंत्रणेसमोर मांडणे सोपे होणार आहे. असाच मुद्दा आमदार अनिल कदम यांनीही उपस्थित करून धरणाचे पाणी अन्यत्र सोडण्याऐवजी कालव्यांच्या माध्यमातून बंधारे, शेततळे भरून दिल्यास या पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होईल. तसेच डिसेंबर, जानेवारीपासून पाण्याची होणारी मागणी टाळता येईल, असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावर गिरीश महाजन यांनी भाष्य करणे टाळले, मात्र त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या सर्वत्र चांगला व दमदार पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षासाठी दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. मात्र धरणांच्या पाण्याचे नियोजन करताना त्याचे काही संकेत आहेत व सप्टेंबरमध्ये किती साठा शिल्लक आहे त्यावरच पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे जायकवाडीला नाशिक व नगरमधून जे पाणी गेल्या दोन-तीन दिवसांत सोडले गेले, त्याचा हिशेब ठेवला गेला तरी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याबाबत काय भूमिका घेते त्यावरच ते अवलंबून राहील, असे सांगितले.