शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

येत्या पाच वर्षात नाशकात लाकडांविना होणार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने ...

नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे. २०५० पर्यंत कार्बनमुक्त शहर करण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता महापालिका त्या दृष्टीने काम करणार असून, येत्या काही वर्षात अंत्यसंस्कारासाठी होत असलेला लाकडांचा वापर पूर्णत: थांबविण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेने टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी काही उद्दिष्ट निश्चित केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पर्यावरणीय दृष्टिकोनातून नाशिक हे अत्यंत उत्तम शहर आहे. त्याची हीच ओळख राहावी यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी या उपक्रमाचे उद्दिष्टदेखील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शाश्वत विकास असाच आहे. त्यात आता नाशिक महापालिकेने युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये सहभाग घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनाचे महासंकट असतानाच यासंदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दहा ते पन्नास लाख लोकसंख्येच्या दुसऱ्या स्तरातील शहरांमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे.

या मोहिमेंतर्गत २०५० पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्बन उत्सर्जन संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट आहे. काही उद्दिष्टे महापालिकेने ठरवायची असून, काही युनोच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.

महापालिकेने येत्या तीन ते पाच वर्षांची काही उद्दिष्ट ठरवली आहेत. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर पूर्णत: थांबवून त्याऐवजी विद्युत तसेच गॅसदाहिनीचा वापर शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरात झाडे लावून ऑक्सिजन हब तयार करणे असे विविध उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे युनोच्या माध्यमातून झिरो कार्बन करण्यासाठी काय करता येईल याबाबत जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

इन्फो..

‘माझी वसुंधरा’मध्ये नाशिक सर्वोत्तम

शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने भरीव कामगिरी केली असून, त्यामुळे शनिवारी (दि. ५) राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सोहळ्यात आयुक्त कैलास जाधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोरोनाकाळातदेखील महापालिकेने पर्यावरणविषयक कामे सुरूच ठेवली. धुलिकरण रोखण्यासाठी खडीच्या रस्त्यावर पाण्याचा वापर, नदीचे संवर्धन, नदीपात्रातील गाळ काढणे, उद्यानातील वृक्ष संवर्धन अशा विविध कारणांमुळे महापालिकेला हा बहुमान मिळाला आहे.

कोट...

महापालिकेने ‘माझी वसुंधरा’अंतर्गत काेराेनाकाळात भरीव काम केले आता युनोच्या झिरो कार्बन मोहिमेत महापालिकेने सहभाग घेतला आहे. २०५० पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत महापालिकेच्या वतीने आगामी तीन ते चार वर्षात काही उद्दिष्ट ठरविण्यात आली आहेत. चांगल्या प्रकल्पांसाठी युनोकडून अर्थसहाय्यदेखील मिळणार आहे.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका