शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन टेक्नॉलॉजीमुळे कॅन्सर रुग्णांना जीवदान : रावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:03 IST

देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य होत असून, त्यानुसार उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बराही होतो आहे़ कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाºया नवीन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन न्यू दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे विभागप्रमुख पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत यांनी केले़

नाशिक : देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य होत असून, त्यानुसार उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बराही होतो आहे़ कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाºया नवीन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन न्यू दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे विभागप्रमुख पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत यांनी केले़   नाशिक सर्जिकल सोसायटी व असोसिएशन आॅफ आॅटोलरिंगोलॉजिस्टस आॅफ इंडिया, नाशिक कान, नाक, घसा तज्ज्ञ संघटना यांच्या सहकार्याने रविवारी (दि़२२) एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर शस्त्रक्रियाविषयक वैद्यकीय परिषद ‘सिम्पोझिअम - २०१८’चे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पद्मश्री रावत यांनी जठर व गुद्द्वाराच्या कॅन्सरवरील उपचार व शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली़ त्यांनी सांगितले की, रुग्णास जठराच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अवघे चार-सहा महिनेच आयुष्य शिल्लक राहत होते तसेच गुदद्वाराच्या कॅन्सरमध्ये ते काढून टाकावे लागत होते़ मात्र, आता शस्त्रक्रियेद्वारे जठराचा कॅन्सर असलेल्या रुग्णाचे आयुष्य वाढले आहे़ तसेच गुदद्वाराचा कॅन्सर हा शस्त्रक्रियेने पूर्णपणे बरा होत असून, त्यासाठी गुदद्वार काढण्याची आवश्यकताही नाही़ देशात कॅन्सरवर सर्व उपचार होत असल्याचे रावत यांनी सांगितले़  या परिषदेमध्ये झालेल्या परिसंवादात डॉ़विनायक श्रीखंडे यांनी कॅन्सरच्या बदलत्या स्वरुपाबाबत माहिती दिली़ टाटा मेमोरीयल हॉस्पीटलचे विभागप्रमुख शैलेश श्रीखंडे यांनी पूर्वी जठराच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया खूप क्लिष्ट होती व रुग्णही घाबरत असे मात्र आता या शस्त्रक्रियेतील धोका कमी झाल्याचे सांगितले़ एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे कर्करोग शल्यचिकित्स्क डॉ़राज नगरकर यांनी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी पूर्वी स्तन काढावा लागत असे, यामुळे महिलांमध्ये सौंदर्य बिघडल्याची मानसिकता होती़ मात्र आता स्तन न काढता महिलेचे सौंदर्य राखून शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याने सांगितले़  वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन डॉ़विनायक श्रीखंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले़ यावेळी नाशिक सर्जिकल सोसायटीचे डॉ़ सुरेश मालेगावकर,सदस्य डॉ़ प्रमोद शिंदे, नाशिक इएनटी सोसायटीचे अध्यक्ष डॉ़शिरीष घन उपस्थित होते़  पुणे येथील डॉ़ अमोल बापये,डॉ़चैतन्य बोर्डे, डॉ़आदित्य मानके, डॉ़नीलेश वासेकर, डॉ़दर्शन पाटील यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले़ या परिषदेत राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़रोबोटिक सर्जरीमुळे दुष्परिणाम कमी झालेच्अहमदाबाद येथील डॉ़ कौस्तुभ पटेल यांनी डोक्याचा व मानेचा कॅन्सरवर शस्त्रक्रियेतील दुष्परिणम रोबोटिक सर्जरीमुळे कमी झाल्याचे सांगितले़ टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ़ पंकज चतुर्वेदी यांनी मुखाच्या कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोटपा कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले़ तर पुण्यातील जहांगिर हॉस्पिटलच्या सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ़स्निता सिनुकुमार यांनी महिलांच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया या दुर्बिनीद्वारे केल्या जात असून महिलांचा प्रत्येक कॅन्सर बरा होत असल्याचे सांगितले़

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टर