शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कांदा : ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतित भाव मिळत नसल्याने साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:46 IST

मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

ठळक मुद्दे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे

मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे; परंतु ढगाळ वातावरणामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सुरक्षित राहील की नाही या चिंंतेने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा हवामानाच्या बदलाचा परिणाम थेट कांदा पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी उत्पादन घटल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे. मानोरी खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. कांद्याला शेवटच्या एक ते दोन पाण्याचा ताण पडल्याने निम्म्याहून जास्त शेतकºयांचे कांदा पीक करपून गेले आहे. हवामान बदलाचा परिणाम होऊ नये म्हणून शेतकºयांनी वेळेवर महागडी कीटकनाशके, औषध फवारणी करूनदेखील उत्पादनात घट झाली असल्याची माहिती येथील शेतकºयांनी दिली. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन पैसे मिळावे म्हणून मजूर वर्ग रणरणत्या उन्हाची पर्वा न करता काम करताना दिसून येत आहे. कांद्याला योग्य भाव नसल्याने नव्याने चाळी उभारून कांदा साठवणुकीवर भर देताना मानोरी परिसरातील शेतकरी दिसून येत आहे. ज्या शेतकºयांकडे कांदाचाळ नाही ते काढलेला कांद्याचे पोळ पाथीच्या साहाय्याने झाकून ठेवत आहेत. मात्र उन्हाच्य तीव्रतेमुळे कांदा सुकून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतमालात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. साठवून ठेवलेल्या कांद्याला या हंगामात योग्य भाव मिळत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. दमट हवामानामुळे कांदा चाळीत सडू नये यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्न करतान दिसत आहे.