शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नवीन कांदा : ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतित भाव मिळत नसल्याने साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:46 IST

मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

ठळक मुद्दे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे

मानोरी : योग्य भाव मिळत नसल्यामुळे बाजारात नेण्याऐवजी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे; परंतु ढगाळ वातावरणामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदा सुरक्षित राहील की नाही या चिंंतेने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा हवामानाच्या बदलाचा परिणाम थेट कांदा पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांनी उत्पादन घटल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे. मानोरी खुर्द येथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. कांद्याला शेवटच्या एक ते दोन पाण्याचा ताण पडल्याने निम्म्याहून जास्त शेतकºयांचे कांदा पीक करपून गेले आहे. हवामान बदलाचा परिणाम होऊ नये म्हणून शेतकºयांनी वेळेवर महागडी कीटकनाशके, औषध फवारणी करूनदेखील उत्पादनात घट झाली असल्याची माहिती येथील शेतकºयांनी दिली. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन पैसे मिळावे म्हणून मजूर वर्ग रणरणत्या उन्हाची पर्वा न करता काम करताना दिसून येत आहे. कांद्याला योग्य भाव नसल्याने नव्याने चाळी उभारून कांदा साठवणुकीवर भर देताना मानोरी परिसरातील शेतकरी दिसून येत आहे. ज्या शेतकºयांकडे कांदाचाळ नाही ते काढलेला कांद्याचे पोळ पाथीच्या साहाय्याने झाकून ठेवत आहेत. मात्र उन्हाच्य तीव्रतेमुळे कांदा सुकून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतमालात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. साठवून ठेवलेल्या कांद्याला या हंगामात योग्य भाव मिळत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. दमट हवामानामुळे कांदा चाळीत सडू नये यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्न करतान दिसत आहे.