नाशिक : सहकारी पतसंस्थांमधील संचालक मंडळाच्या धोरणामुळे राज्यातील पाच हजार पतसंस्था अडचणीत सापडल्या असून, लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत़ भ्रष्टाचारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.पतसंस्थांच्या मनमानी कारभाराला चाप बसविणे, तसेच नियंत्रणासाठी नवीन कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, येत्या पावसाळी अधिवेशनात त्यास मंजुरी मिळेल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (दि़ २९) पत्रकार परिषदेत दिली़शासनस्तरावरील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आयोजित जनता दरबारानंतर ते बोलत होते़ चंद्रकांत हरी बढे पतसंस्था, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था, सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था, समृद्ध जीवन यांसारख्या मल्टिस्टेट सहकारी संस्थांमध्ये ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले आहेत़ सहकारी संस्थांनी मुदतठेवींसाठी व्याजदर किती ठेवावा, कर्जवाटप कुणाला व किती करावे यावर यापूर्वी बंधन नव्हते़ तसेच या पतसंस्थांच्या संचालक मंडळाने नियमबाह्य कारभार केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे़ त्यामुळे संचालक मंडळाच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी कायद्याचे सुतोवाच मंत्री दादा भुसे यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
येत्या अधिवेशनात नवीन सहकार कायदा
By admin | Updated: June 30, 2016 00:23 IST