शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सारूळच्या उत्खननाकडे प्रदूषण खात्याचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 15, 2017 00:27 IST

इगतपुरी : तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला येथील डोंगर, टेकड्यांचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला येथील डोंगर, टेकड्यांचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत असून, या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने प्रदूषणामुळे मानवी आरोग्यासोबत झाडांचेही नुकसान होत असल्याची तक्रार पंचवटी पांजरापोळ या संस्थेने केली आहे. सारूळ व राजूर बहुला या ठिकाणी असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करून या ठिकाणी खडी क्रशर चालविले जात आहे. अनेक वर्षांपासून दिवस रात्र सदरचे काम केले जात असून, परिसरातील डोंगर, टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन पोहचल्या आहेत. दगड उपसा करताना खाणमालकांकडून बोअर ब्लास्टिंग केले जात असून, त्यासाठी घातक स्फोटकांचा वापर केला जात आहे. परिणामी या भागातील घरांना तडे पडले असून, तेथे राहणे धोकादायक झालेले आहे. स्फोटकांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या खोदकामावर बंदी घालण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यापार्श्वभूमीवर नाशिक तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचवटी पांजरापोळ या संस्थेनेही तक्रार केली आहे. सारूळ शिवारात संस्थेची जागा असून, या ठिकाणी सेंद्रियपद्धतीने शेती केली जाते. पेरू, आंबे, सीताफळ, चिकू आदि शेकडो झाडे या ठिकाणी आहेत तसेच जनावरांसाठी चाराही पिकविला जात आहे, परंतु दिवसरात्र डोंगर उत्खननामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील जमिनीची पोत खराब होऊन झाडांनाही प्रदूषणाचा फटका बसून त्यांच्या उत्पादनात घट निर्माण झाली आहे.