शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

सारूळच्या उत्खननाकडे प्रदूषण खात्याचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 15, 2017 00:27 IST

इगतपुरी : तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला येथील डोंगर, टेकड्यांचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला येथील डोंगर, टेकड्यांचे उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत असून, या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने प्रदूषणामुळे मानवी आरोग्यासोबत झाडांचेही नुकसान होत असल्याची तक्रार पंचवटी पांजरापोळ या संस्थेने केली आहे. सारूळ व राजूर बहुला या ठिकाणी असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करून या ठिकाणी खडी क्रशर चालविले जात आहे. अनेक वर्षांपासून दिवस रात्र सदरचे काम केले जात असून, परिसरातील डोंगर, टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन पोहचल्या आहेत. दगड उपसा करताना खाणमालकांकडून बोअर ब्लास्टिंग केले जात असून, त्यासाठी घातक स्फोटकांचा वापर केला जात आहे. परिणामी या भागातील घरांना तडे पडले असून, तेथे राहणे धोकादायक झालेले आहे. स्फोटकांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या खोदकामावर बंदी घालण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यापार्श्वभूमीवर नाशिक तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर पंचवटी पांजरापोळ या संस्थेनेही तक्रार केली आहे. सारूळ शिवारात संस्थेची जागा असून, या ठिकाणी सेंद्रियपद्धतीने शेती केली जाते. पेरू, आंबे, सीताफळ, चिकू आदि शेकडो झाडे या ठिकाणी आहेत तसेच जनावरांसाठी चाराही पिकविला जात आहे, परंतु दिवसरात्र डोंगर उत्खननामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील जमिनीची पोत खराब होऊन झाडांनाही प्रदूषणाचा फटका बसून त्यांच्या उत्पादनात घट निर्माण झाली आहे.