शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

नेताजी आणि सावरकर यांचे मार्ग भिन्न; मात्र ध्येय एक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी,शस्त्र आणि शब्द यातून क्रांतीला आणि क्रांतिकारकांना ...

नाशिक : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी,शस्त्र आणि शब्द यातून क्रांतीला आणि क्रांतिकारकांना प्रेरणा देताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या दोघांनीही दिलेले योगदान अनमाेल असल्याचे ॲड. भानुदास शौचे यांनी सांगितले.

वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृतिप्रीत्यर्थ अठ्ठाविसावे पुष्प त्यांनी गुंफले. या वेळी ॲड. शौचे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.

सधन कुटुंबात जन्माला येऊनही नेताजींनी स्वतंत्र भारताचा ध्यास घेतला. अवघ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी इंग्रजांच्या छातीत धडकी भरवली. संघर्ष, त्याग यातून नेताजींनी देश स्वतंत्र कसा होईल, यासाठी आयुष्य पणाला लावले. ‘द इंडियन स्ट्रगल’ आणि ‘इंडियन पिलग्रीम’ या पुस्तकातून जहाल विचारांची पेरणी करताना नेताजींनी काॅंग्रेस संघटनेतील प्रस्थापितांशी संघर्ष केला. भारत स्वतंत्र व्हावा हा एकमेव उद्देश नेताजींसमोर होता, असेही शौचे यांनी नमूद केले.

नेताजी आणि सावरकर यांचे विचार वेगळे असले तरी ध्येय मात्र ब्रिटिशांपासूनच्या देशमुक्तीचे होते. प्रसंगी बलिदान देण्याची भावना त्यांच्यात होती. दोघांनीही जीवनात राष्ट्रविचारालाच सर्वप्रथम स्थान दिले. त्यापुढे कोणताही विचार असू शकत नाही. म्हणून राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे ॲड. शौचे यांनी नमूद केले.

आझाद हिंद सेनेची स्थापना करून नेताजींनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. तेव्हा क्षेत्रहीन सरकार म्हणून जपानने आझाद हिंद सेनेला मान्यता देऊन त्यांना अंदमान, निकोबार बेटे दिली होती.

सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देताना ॲड. शौचे यांनी सावकरांच्या शब्दांतूनच क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाल्याचे ॲड. शौचे यांनी नमूद केले. स्वातंत्र्य देवतेचे स्तोत्र, शिवरायांची आरती म्हणजे देशाचा मोठा ठेवा आहे. जातिभेद, अस्पृश्य निवारण यासाठी सावरकरांनी कोकणात पतित पावन मंदिराच्या स्थापनेसह सर्व समाजांच्या एकत्रीकरणावर भर दिल्याचेही त्यांनी सांगितले. क्रांतिकारकांनी स्वतःचा विचार केला असता, तर भारत स्वतंत्र झाला नसता. आपण जगतो ते क्रांतिकारकांच्या कष्टाचे फळ असल्याचे मत ॲड. शौचे यांनी नमूद केले. व्याख्यानमालेच्या चिटणीस संगीता बाफना यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.

-------------------------

आजचे व्याख्यान

वक्ते : डॉ. शिरीष राजे

विषय : स्व-मनाची शक्ती

फोटो

२८ॲड. शौचे