शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पोलिसांचे दुर्लक्ष : पादचाºयांच्या हातातील मोबाइल हिसकाविण्याचे प्रकार मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:23 IST

नाशिकरोड : परिसरामध्ये रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºयांच्या हातातून दुचाकीवरून येणारे चोरटे मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

ठळक मुद्देमोबाइल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू ‘कानून के हाथ लंबे होते है’

नाशिकरोड : परिसरामध्ये रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºयांच्या हातातून दुचाकीवरून येणारे चोरटे मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोबाइल चोरटे व चोरीचे मोबाइल विकत घेणाºयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.धावपळीच्या युगात मोबाइल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. दुचाकीवरून येणाºया सोनसाखळी चोरट्यांप्रमाणेच रस्त्याने पायी मोबाइलवर बोलत जाणाºया महिला, युवती, नागरिक, वयोवृद्ध यांच्या पाठीमागून दुचाकीवर येणारे चोरटे मोबाइल हिसकावून घेऊन जात आहेत. काही क्षणात हजारो रुपयांचा मोबाइल हिसकावून चोरटे दुचाकीवरून धूम स्टाईल फरार होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.पोलिसांनी छडा लावण्याची गरज‘कानून के हाथ लंबे होते है’ ही म्हण प्रसिद्ध असून, तिचा प्रत्ययदेखील अनेकवेळा आला आहे. दररोज अनेक मोबाइल चोरीला जात असल्याने व त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने चोरट्यांचे फावते आहे. पोलिसांनी मोबाइल चोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सीसीटीव्ही कॅमेरे, खबरे यांच्यामार्फत दुचाकीवरील मोबाइल चोरट्यांचा व चोरीचे मोबाइल विकत घेणाºयांचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अल्पवयीन चोरटे निघाल्यास ‘खाकी’ची ताकद दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पायी मोबाईलवर बोलत जाणे धोक्याचे होऊन बसले आहे. ज्यांचा मोबाईल हिसकावुन चोरून नेला जातो तो संबंधित धावपळ करत पोलीस ठाण्यात धाव घेतो. चोरीला गेलेल्या मोबाईलवरून कुठे फोन करून चोरट्यांनी काही उलटे-पालटे बोलल्यास अजून उपद्व्याप वाढेल म्हणून संबंधित इसम पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याचे पत्र देतो. त्यावर पोलिसांनी नोंद करून सही शिक्का दिल्यानंतर संबंधित इसम ज्या कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन आपला मोबाईल क्रमांक बंद करतो. प्रत्येकाला पोलीस लागलीच मोबाइल चोरी झाल्याचा दाखला लगेच देतात असे होत नसल्याने संबंधितांची चांगलीच घालमेल सुरू असते. पोलिसांच्या मोबाइल गहाळ झाल्याच्या सही- शिक्क्याच्या दाखल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती त्याच कंपनीकडून आपला पूर्वीच्या मोबाइल क्रमांकाचे सीमकार्ड मिळवते. मात्र मोबाइल चोरीला गेल्याने त्यामधील कॉण्टॅक्ट क्रमांक, फोटो, व्हिडीओ आदी खासगी महत्त्वाची माहिती काही क्षणात हातून निघून जाते.