शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

जमीन व्यवहारात कायद्याचा अभ्यास गरजेचा

By admin | Updated: December 9, 2015 23:45 IST

रिअल्टर्स डे : ‘एआरसी’च्या परिसंवादात उमटला सूर

नाशिक : जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक टाळता येणे शक्य होईल. तसेच जमिनीचे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांनी स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या कायद्याचा सखोल अभ्यास ठेवणे काळाची गरज असल्याचा सूर परिसंवादात उमटला.सोशल वेल्फेअर असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट कन्सल्टंट (एआरसी) यांच्यातर्फे संध्याकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘सातबारा रिअल्टर्स डे’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अजित मराठे, कायदेतज्ज्ञ एम. डी. कुलकर्णी, नॅशनल असोसिएशन आॅफ इंडियाचे पश्चिमप्रमुख विनोद ठक्कर, रवि वर्मा, अ‍ॅड. नीळकंठ अहेर, जय पटेल, सुजॉय गुप्ता, प्रवीण फणसे आदि उपस्थित होते.कुळकायदा, रीत, भोगवटा, जमीन कमाल धारणा कायदा, तळेगाव दाभाडे योजना, वारसा हक्क, स्त्रियांचे हक्क व अधिकार, आदिवासी जमीन विषयक कायदा, घटनात्मक निवाडे आदिंबाबत कुलकर्णी यांनी माहिती दिली. तसेच ठक्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी जमिनीविषयक व्यवहार करणाऱ्यांना ‘दलाल’ असे म्हटले जात होते; मात्र काळानुरूप हा शब्दप्रयोग बदलला असून, ब्रोकर, रिअल्टर्स असे शब्दप्रयोग वापरले जात आहेत. त्यामुळे या व्यवसायातील लोकांना आगळा नावलौकिक प्राप्त होऊ लागला आहे. रिअल्टर्सकडून समाजात संबंध अधिकाधिक प्रस्थापित करून पारदर्शक व्यवहारावर भर दिल्यास त्यांच्यावरील जनमानसाचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असे वर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित रिअल्टर्सकडून विविध प्रश्नांच्या माध्यमातून शंकांचे निरसन करून घेण्यात आले. सूत्रसंचालन सुमित्रा महाजन यांनी केले.