शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

दीड हजार बंद उद्योगांवर तोडगा काढण्याची गरज

By admin | Updated: June 1, 2017 01:49 IST

सातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत.

 गोकुळ सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत. हे बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असून, तसे झाल्यास बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होतील, त्याचबरोबर कारखान्यांची थांबलेली चाके पुन्हा सुरू होतील. नाशिकमध्ये बंद पडलेले उद्योग ही गंभीर समस्या आहे. चुकीचे व्यवस्थापन, वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगार कलह, कर्जबाजारी, शासनाचे धोरण, युनियन व्यवस्थापन यांच्यातील वाद अशा अनेक कारणांचा समावेश आहे. असे कारखाने बंद पडून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बंद पडलेले कारखाने ओस पडले आहेत. अशी भकास परिस्थिती पहावयास मिळत आहे. सदरचे बंद कारखाने सुरू करण्यासाठी त्या त्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनच प्रयत्न व्हावेत, यासाठी एक मागणी आहे, परंतु वेगवेगळ्या पातळीवर शासनाने अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. वादग्रस्त बंद पडलेले कारखाने एमआयडीसी ताब्यात घेऊ शकत नाही, असे शासनाचे धोरण असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेऊन ठेवलेले आहेत, असे भूखंड तरी नियमाप्रमाणे ताब्यात घेणे गरजेचे आहे. बंद पडलेले उद्योग आणि रिक्त भूखंड ताब्यात घेतले तरी अनेक मोठे उद्योग प्रकल्प उभे राहू शकतात. एमआयडीसीने आतापर्यंत रिक्त भूखंडधारकांना फक्त नोटिसा बजावून कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यात असे किती तरी उद्योजक आहेत जे भाड्याच्या जागेत कसाबसा उद्योग चालवीत आहे. अशा उद्योजकांना जागा दिल्यास नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.