शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

दीड हजार बंद उद्योगांवर तोडगा काढण्याची गरज

By admin | Updated: June 1, 2017 01:49 IST

सातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत.

 गोकुळ सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत. हे बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असून, तसे झाल्यास बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होतील, त्याचबरोबर कारखान्यांची थांबलेली चाके पुन्हा सुरू होतील. नाशिकमध्ये बंद पडलेले उद्योग ही गंभीर समस्या आहे. चुकीचे व्यवस्थापन, वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगार कलह, कर्जबाजारी, शासनाचे धोरण, युनियन व्यवस्थापन यांच्यातील वाद अशा अनेक कारणांचा समावेश आहे. असे कारखाने बंद पडून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बंद पडलेले कारखाने ओस पडले आहेत. अशी भकास परिस्थिती पहावयास मिळत आहे. सदरचे बंद कारखाने सुरू करण्यासाठी त्या त्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनच प्रयत्न व्हावेत, यासाठी एक मागणी आहे, परंतु वेगवेगळ्या पातळीवर शासनाने अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. वादग्रस्त बंद पडलेले कारखाने एमआयडीसी ताब्यात घेऊ शकत नाही, असे शासनाचे धोरण असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेऊन ठेवलेले आहेत, असे भूखंड तरी नियमाप्रमाणे ताब्यात घेणे गरजेचे आहे. बंद पडलेले उद्योग आणि रिक्त भूखंड ताब्यात घेतले तरी अनेक मोठे उद्योग प्रकल्प उभे राहू शकतात. एमआयडीसीने आतापर्यंत रिक्त भूखंडधारकांना फक्त नोटिसा बजावून कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यात असे किती तरी उद्योजक आहेत जे भाड्याच्या जागेत कसाबसा उद्योग चालवीत आहे. अशा उद्योजकांना जागा दिल्यास नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.