शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

राज्य सरकारला उलथवण्याची गरज

By admin | Updated: October 11, 2014 00:26 IST

राज्य सरकारला उलथवण्याची गरज

येवला : मागील १५ वर्षांपासून राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र पाणी, वीज, रस्ते, आरोग्य शिक्षण, हे मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारला उलथवण्याची गरज आहे. न्याय हक्क हिरावून घेणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, मग बघा भ्रष्टाचाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवला येथील जाहीर सभेत बोलताना केले. येवला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील गोशाला मैदानावर ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाचा नाकर्तेपणा व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. २००९च्या विधानसभेच्या वेळी येवल्यात पाऊस असल्याने हेलिकॉप्टर येऊ शकले नाही, पण विरोधकांनी सेनेने मांडवली केल्याची अफवा उठविली. मांडवली करणाऱ्यांमधली शिवसेना नाही असा खुलासा करतानाच नॉलेज सिटीला स्वत:चे नाव दिले तेव्हा समतेचा आव आणणाऱ्यांना सावित्रीबाई फुले आठवल्या नाही का? असा सवाल त्यांनी केला. इजिप्त व अफगाणमधील कांदा आयात होतो आहे.शेतकरी हितासाठी आपण आंदोलन केले पाहिजे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी मांडली. परंतु केंद्रात आपले सरकार असल्याने थेट आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारला कांदा उत्पादकांची व्यथा सांगू व चर्चा करू, असे मी सांगितले. पण, शेट्टी व खोत यांनी चर्चे अगोदरच कृषिमंत्र्याचा पुतळा जाळला आणि ठिणगी पडली तरी पुन्हा शेवटी हे दोघेही भाजपाच्या दावणीला गेले असल्याचे ते म्हणाले. हे दोघे गेले असले तरही शेतकरी शिवसेनेबरोबर असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आम्हाला शहरीबाबू म्हणून हिणवणारे शरद पवार यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दोन पैसे मिळू दिले नाही व खऱ्या अर्थाने पवारांनीच शेतकऱ्यांना लुटले असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे यांनी केला. आम्हाला शेती कळत नसली तरी शेतकरी कळतो,अशी कोपरखिळी ठाकरे यांनी मारली.माजी आमदार मारोतराव पवार यांनी भुजबळांच्या पुनर्वसनाचा येवल्यातील करार संपला आहे. तो आता जनताच रद्द करेल, असे भावनिक आवाहन केले. भुजबळ यांनी केवळ आप्तस्वकियांचा विकास केला, अशी टीका शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांनी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. (वार्ताहर)