शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

राज्य सरकारला उलथवण्याची गरज

By admin | Updated: October 11, 2014 00:26 IST

राज्य सरकारला उलथवण्याची गरज

येवला : मागील १५ वर्षांपासून राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र पाणी, वीज, रस्ते, आरोग्य शिक्षण, हे मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारला उलथवण्याची गरज आहे. न्याय हक्क हिरावून घेणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, मग बघा भ्रष्टाचाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवला येथील जाहीर सभेत बोलताना केले. येवला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील गोशाला मैदानावर ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाचा नाकर्तेपणा व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. २००९च्या विधानसभेच्या वेळी येवल्यात पाऊस असल्याने हेलिकॉप्टर येऊ शकले नाही, पण विरोधकांनी सेनेने मांडवली केल्याची अफवा उठविली. मांडवली करणाऱ्यांमधली शिवसेना नाही असा खुलासा करतानाच नॉलेज सिटीला स्वत:चे नाव दिले तेव्हा समतेचा आव आणणाऱ्यांना सावित्रीबाई फुले आठवल्या नाही का? असा सवाल त्यांनी केला. इजिप्त व अफगाणमधील कांदा आयात होतो आहे.शेतकरी हितासाठी आपण आंदोलन केले पाहिजे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी मांडली. परंतु केंद्रात आपले सरकार असल्याने थेट आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारला कांदा उत्पादकांची व्यथा सांगू व चर्चा करू, असे मी सांगितले. पण, शेट्टी व खोत यांनी चर्चे अगोदरच कृषिमंत्र्याचा पुतळा जाळला आणि ठिणगी पडली तरी पुन्हा शेवटी हे दोघेही भाजपाच्या दावणीला गेले असल्याचे ते म्हणाले. हे दोघे गेले असले तरही शेतकरी शिवसेनेबरोबर असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आम्हाला शहरीबाबू म्हणून हिणवणारे शरद पवार यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दोन पैसे मिळू दिले नाही व खऱ्या अर्थाने पवारांनीच शेतकऱ्यांना लुटले असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे यांनी केला. आम्हाला शेती कळत नसली तरी शेतकरी कळतो,अशी कोपरखिळी ठाकरे यांनी मारली.माजी आमदार मारोतराव पवार यांनी भुजबळांच्या पुनर्वसनाचा येवल्यातील करार संपला आहे. तो आता जनताच रद्द करेल, असे भावनिक आवाहन केले. भुजबळ यांनी केवळ आप्तस्वकियांचा विकास केला, अशी टीका शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांनी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. (वार्ताहर)