शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारला उलथवण्याची गरज

By admin | Updated: October 11, 2014 00:26 IST

राज्य सरकारला उलथवण्याची गरज

येवला : मागील १५ वर्षांपासून राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र पाणी, वीज, रस्ते, आरोग्य शिक्षण, हे मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे आता राज्य सरकारला उलथवण्याची गरज आहे. न्याय हक्क हिरावून घेणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेला एकहाती सत्ता द्या, मग बघा भ्रष्टाचाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येवला येथील जाहीर सभेत बोलताना केले. येवला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शहरातील गोशाला मैदानावर ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाचा नाकर्तेपणा व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. २००९च्या विधानसभेच्या वेळी येवल्यात पाऊस असल्याने हेलिकॉप्टर येऊ शकले नाही, पण विरोधकांनी सेनेने मांडवली केल्याची अफवा उठविली. मांडवली करणाऱ्यांमधली शिवसेना नाही असा खुलासा करतानाच नॉलेज सिटीला स्वत:चे नाव दिले तेव्हा समतेचा आव आणणाऱ्यांना सावित्रीबाई फुले आठवल्या नाही का? असा सवाल त्यांनी केला. इजिप्त व अफगाणमधील कांदा आयात होतो आहे.शेतकरी हितासाठी आपण आंदोलन केले पाहिजे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी मांडली. परंतु केंद्रात आपले सरकार असल्याने थेट आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारला कांदा उत्पादकांची व्यथा सांगू व चर्चा करू, असे मी सांगितले. पण, शेट्टी व खोत यांनी चर्चे अगोदरच कृषिमंत्र्याचा पुतळा जाळला आणि ठिणगी पडली तरी पुन्हा शेवटी हे दोघेही भाजपाच्या दावणीला गेले असल्याचे ते म्हणाले. हे दोघे गेले असले तरही शेतकरी शिवसेनेबरोबर असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आम्हाला शहरीबाबू म्हणून हिणवणारे शरद पवार यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दोन पैसे मिळू दिले नाही व खऱ्या अर्थाने पवारांनीच शेतकऱ्यांना लुटले असल्याचा घणाघाती आरोप ठाकरे यांनी केला. आम्हाला शेती कळत नसली तरी शेतकरी कळतो,अशी कोपरखिळी ठाकरे यांनी मारली.माजी आमदार मारोतराव पवार यांनी भुजबळांच्या पुनर्वसनाचा येवल्यातील करार संपला आहे. तो आता जनताच रद्द करेल, असे भावनिक आवाहन केले. भुजबळ यांनी केवळ आप्तस्वकियांचा विकास केला, अशी टीका शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांनी केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. (वार्ताहर)