शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अवयवदानाविषयी जनजागृतीची गरज

By admin | Updated: August 14, 2016 02:16 IST

परिसंवाद : गैरसमज दूर करणे आवश्यक; प्रत्यारोपण तज्ज्ञांचे मत

अवयवदानाविषयी जनजागृतीची गरजनाशिक : भारतात हजारो रुग्ण अवयव निकामी होऊन मृत्यू पावतात. मात्र अवयवदानातून हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकते. आपल्याकडे अवयवदानाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने अवयवदानाविषयी समाजातील सर्व स्तरात सोशल माध्यमांसह विविध प्रकारे जनजागृती करण्याची गरज असल्याचा सूर ‘अवयवदान काळाची गरज’ परिसंवादातून उमटला. यावेळी प्रत्यारोपणतज्ज्ञ, फुफ्फुस प्रत्यारोपणतज्ज्ञ व हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञांनी अवयवदानाविषयी विविध माध्यमांतून जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली.अवयवदान दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, फोर्टिस हॉस्पिटल आणि रोटरी क्लब आॅफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘अवयवदान काळाची गरज’ विषयावर परिसंवाद पार पडला. व्यासपीठावर आयएमएचे डॉ. अनिरु द्ध भंडारकर, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. सुरेश सूर्यवंशी यांच्यासह डॉ. राजेंद्र नेहेते, भावेश पटेल, किशोर पटेल, राजेश पाटील आदि उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना प्रत्यारोपण तज्ज्ञ राहुल पंडित यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, आपल्या स्वकियांना मृत्यूनंतरही अवयवाच्या रूपाने जीवित ठेवण्यासाठी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी अवयवदानासाठी पुढे येण्याची गरज आहे, तर हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी रुग्णास मेंदूमृत घोषित करण्याची आणि अवयवदानाची प्रक्रिया समजावून सांगितली. अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया झेडटीटीसीच्या नियंत्रणात होत असल्याने या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोणत्याही जाती धर्माचा तसेच आजार असलेला व्यक्ती अवयवदान करू शकतो. त्यासाठी अवयवदान करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने अथवा मृतावस्थेतील व्यक्तीच्या नातेवाइकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अवयवदान दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांचे व्यवस्थापन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले. डॉ. प्रशांत देवरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)