शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शांतता मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज

By admin | Updated: October 26, 2016 00:00 IST

जागतिक शांतता परिषद : परिसंवादात उमटला तज्ज्ञांचा सूर

नाशिक : जागतिक स्तरावार शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध स्तरावार सुप्रशासन आणि अहिंसेसाठी शांतता मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्र म विकसित करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक शांतता परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात उमटला. चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी जागतिक नागरिकत्वाच्या विषयालाही यावेळी हात घातला.एसएमआरके महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या शांतता परिषदेत ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ विषयी परिचर्चेत जागतिक नागरिकत्वाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. आग्यार होते. सहअध्यक्ष अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. टी. देशमुख होते. या चर्चेत अमेरिकेतील मुलांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेच्या संस्थापक डॉ. नीना मेयरहॉफ, अमेरिकेतील नॅशनल हार्मोनी पीस अकॅडमीचे महासंचालक लज उतरेजा, हवाईयन आर्ट आॅफ प्रॉब्लेम सॉल्व्हिगच्या (हवाई) कार्यकर्त्या डेम मेबल काटझ, नागालँड मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रियरंजन त्रिवेदी, नेपाळच्या शांतता शिक्षिका संध्या ह्योलोमो यांनी सहभाग घेतला. उपस्थित तज्ज्ञांनी जागतिक नागरिकत्वाची संकल्पना चांगली असली तरी ती प्रत्यक्षात येणे अवघड म्हटले. शांतता शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा आणि तज्ज्ञांनी त्यासाठी सूचना कराव्यात, असा मतप्रवाह परिचर्चेत उमटला. परस्पर सहकार्य वाढविले आणि गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण मिळाली तर सुशासन शक्य असल्याचे मत परिसंवादत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सरिता औरंगाबादकर आणि संजय पाबारी यांनी केले. (प्रतिनिधी)