शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

आंदोलनाची गरज की चुकांवर पांघरूण?

By admin | Updated: July 24, 2014 01:01 IST

मनसेची आक्रमकता : पक्षांतर्गत असमन्वय चव्हाट्यावर; निष्क्रियतेचे खापर राज्य सरकारवर

नाशिक : पालिकेत कामेच होत नाहीत, या विरोधकांच्या तक्रारींवर आज सत्तारूढ मनसेनेच आंदोलन करून शिक्कामोर्तब केले आहे. फरक एवढाच आहे की, त्यांनी या निष्क्रियतेचे खापर राज्य सरकारवर फोडले आहे. मनसेची सत्ता आल्यानंतर पालिकेत एकही भरीव काम झालेले नाही, असा प्रचार विरोधकांनी राज्यभर केला होता. त्याची पुनरावृत्ती आता होऊ नये यासाठी राज्य सरकारवर जबाबदारी लोटण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजकारण म्हणून तेही ठीक म्हटले तरी त्यानिमित्ताने पक्षातील असमन्वय आणि अपरिपक्वतादेखील चव्हाट्यावर आली.महापालिकेत पूर्णवेळ आयुक्त नाही. पूर्णवेळ आयुक्ताची नियुक्ती व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी करण्यात आली. पण त्याचा उपयोग झाला नसल्याने मनसे आता आक्रमक झाली असली, तरी आंदोलन इतके विलंबाने सुचले हे आश्चर्यकारक आहे. गेल्याच आठवड्यात शिवसेनेने हा मुद्दा हाती घेऊन पालिकेच्या ज्या प्रवेशद्वारावर जेथे आंदोलन केले, त्याच पायऱ्यांवर आंदोलन करून मनसेने जणू सेनेची नक्कल केली. सेनाही अशी टीका करण्यास मोकळी झाली आहे.राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करायचे तर त्यासाठी पालिकेचे प्रवेशद्वार ही योग्य जागा नव्हती. जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी अधिकारी असल्याने तेथे आंदोलन सोयीचे झाले असते. तसे न झाल्याने जे मुळातच ‘प्रभारी’ आहेत त्या आयुक्तांकडेच पूर्णवेळ आयुक्त नियुक्त करण्याची मागणी करून काय होणार? त्यामुळेच आयुक्तांनी या निवेदनाचे मी काय करू असा आंदोलकांना केलेला प्रश्नच मनसेच्या अज्ञानावर प्रकाश टाकणारा होता. आयुक्तांच्या टीकेला महापौरांनी उत्तर देण्याच्या प्रकारामुळे तर महापौर वेगळे आणि मनसेचे नगरसेवक वेगळे आहेत, हे तितकेच स्पष्ट झाले. विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मनसेने सारवासारव केली असली, तरी एकंदरच यातून निष्पन्न काय झाले, असा प्रश्न निर्माण झाला. मनसेवर निष्क्रियतेचे ठपका ठेवणाऱ्यांना सांगण्यासाठी आयुक्त नाहीत हे कारण दाखवणारे हे कातडी बचाव आंदोलन होते इतकेच! (प्रतिनिधी)