शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

गटशेती प्रकल्प राज्यभर राबविण्याची गरज

By admin | Updated: January 15, 2015 00:03 IST

कैलाश मोते : मुक्त विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : विभागात गटशेतीच्या उत्पादन ते विक्र ी यामधील विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नाशिक व परिसरात गटशेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आता लोकसहभाग वाढत आहे. सद्यस्थितीचा विचार करता गटशेतीवर विशेष भर देण्याची गरज आहे. नाशिकचा गटशेती प्रकल्प राज्यभर राबविल्यास शेती व्यवसायास गती मिळणार असून, त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलाश मोते यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषिविद्याप्रमुख डॉ. मधुकर धोंडे आदि उपस्थित होते. मोते म्हणाले की, शासनामार्फत गरजानुरूप बऱ्याच योजना असून, प्रकल्प स्वरूपात त्या पुढे आणणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वंकष गरजा भागविता येतील. नाशिकसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागली व वरईसारखी पिके घेतली जातात; परंतु त्यांच्या प्रक्रि या उद्योगावर भर दिला जात नाही. विस्तार यंत्रणांनी पीकनिहाय गरजा ओळखून त्यानुसार सर्वांगीण विकास योजना तयार करून प्रभावीरीत्या त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीही योजना तयार करण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत आपला कार्यशील सहभाग नोंदविण्यासाठी पुढे यावे, असेही मोते यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केले. केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले. प्रदर्शनात कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेशीम उद्योग विभाग, महाराष्ट्र बँक तसेच अनेक कृषी उद्योजकांनी सहभाग नोंदवला. (प्रतिनिधी)