शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गटशेती प्रकल्प राज्यभर राबविण्याची गरज

By admin | Updated: January 15, 2015 00:03 IST

कैलाश मोते : मुक्त विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : विभागात गटशेतीच्या उत्पादन ते विक्र ी यामधील विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नाशिक व परिसरात गटशेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आता लोकसहभाग वाढत आहे. सद्यस्थितीचा विचार करता गटशेतीवर विशेष भर देण्याची गरज आहे. नाशिकचा गटशेती प्रकल्प राज्यभर राबविल्यास शेती व्यवसायास गती मिळणार असून, त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलाश मोते यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषिविद्याप्रमुख डॉ. मधुकर धोंडे आदि उपस्थित होते. मोते म्हणाले की, शासनामार्फत गरजानुरूप बऱ्याच योजना असून, प्रकल्प स्वरूपात त्या पुढे आणणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वंकष गरजा भागविता येतील. नाशिकसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागली व वरईसारखी पिके घेतली जातात; परंतु त्यांच्या प्रक्रि या उद्योगावर भर दिला जात नाही. विस्तार यंत्रणांनी पीकनिहाय गरजा ओळखून त्यानुसार सर्वांगीण विकास योजना तयार करून प्रभावीरीत्या त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीही योजना तयार करण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत आपला कार्यशील सहभाग नोंदविण्यासाठी पुढे यावे, असेही मोते यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केले. केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले. प्रदर्शनात कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेशीम उद्योग विभाग, महाराष्ट्र बँक तसेच अनेक कृषी उद्योजकांनी सहभाग नोंदवला. (प्रतिनिधी)