शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

गटशेती प्रकल्प राज्यभर राबविण्याची गरज

By admin | Updated: January 15, 2015 00:03 IST

कैलाश मोते : मुक्त विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : विभागात गटशेतीच्या उत्पादन ते विक्र ी यामधील विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांनी अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. नाशिक व परिसरात गटशेती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आता लोकसहभाग वाढत आहे. सद्यस्थितीचा विचार करता गटशेतीवर विशेष भर देण्याची गरज आहे. नाशिकचा गटशेती प्रकल्प राज्यभर राबविल्यास शेती व्यवसायास गती मिळणार असून, त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. कैलाश मोते यांनी केले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषिविद्याप्रमुख डॉ. मधुकर धोंडे आदि उपस्थित होते. मोते म्हणाले की, शासनामार्फत गरजानुरूप बऱ्याच योजना असून, प्रकल्प स्वरूपात त्या पुढे आणणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वंकष गरजा भागविता येतील. नाशिकसारख्या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागली व वरईसारखी पिके घेतली जातात; परंतु त्यांच्या प्रक्रि या उद्योगावर भर दिला जात नाही. विस्तार यंत्रणांनी पीकनिहाय गरजा ओळखून त्यानुसार सर्वांगीण विकास योजना तयार करून प्रभावीरीत्या त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनीही योजना तयार करण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत आपला कार्यशील सहभाग नोंदविण्यासाठी पुढे यावे, असेही मोते यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी केले. केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले. प्रदर्शनात कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, दुग्धव्यवसाय विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेशीम उद्योग विभाग, महाराष्ट्र बँक तसेच अनेक कृषी उद्योजकांनी सहभाग नोंदवला. (प्रतिनिधी)