शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शासनाने संभ्रम दूर करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:52 IST

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यातच पालकांचीच नव्हे तर शिक्षणसंस्थांची मानसिकता नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न करता शाळा सुरू करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक- शिक्षकेतरांनी केला आहे.

नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, त्यातच पालकांचीचनव्हे तर शिक्षणसंस्थांची मानसिकता नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न करताशाळा सुरू करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक- शिक्षकेतरांनी केला आहे.कोरोनामुळे गेली अडीच ते पावणेतीन महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्या आता सुरू करण्याची तयारी आहे. अर्थात देशात, राज्यात आणि नाशिकमध्येदेखील कोरोनाचा धोका कमी झालेले नाही. अशावेळी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून विचारणा करीत आहेत. तथापि, यासंदर्भात पालकांचा कल मात्र तसा नाही. पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीच; परंतु शिक्षकांनीदेखील या मुलांची काळजी घण्याची जोखीम पत्करायची नाही. अर्थात, यासंदर्भात प्रचंड गोंधळ आहे. राज्य शासनाने आधी १५ जून तारीख घोषित केली. नंतर आॅनलाइनचा पर्यायच सुरू झाला. तर केंद्र शासनाने सरळ आॅगस्ट महिन्यातच शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मग इतका गोंधळ कशासाठी हेच समजण्यापलीकडे आहे. शिक्षण खात्याने आधी गोंधळ दूर करावा, मगच पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना शिक्षक- मुख्याध्यापकांकडून केली जाते.------------------------शाळा सुरू करण्याअगोदर शासनाने सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण द्यावे, तसेचशाळेत आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच पालकांचे रीतसर हमीपत्र घ्यावे. त्यानंतर आधी नववी-दहावी आणि नंतर त्याखालील दोन-दोन वर्ग सुरू करावेत. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक काळजी घेतातच, मग त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन अविश्वास ठराव कशासाठी?- एस. बी. देशमुख, सचिव,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

टॅग्स :Nashikनाशिक