शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज - दाभोलकर

By admin | Updated: December 23, 2014 22:14 IST

धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज - दाभोलकर

मालेगाव : धर्माच्या नावावर अधर्मतेचे खेळ पसरविणारेच सत्तेत येऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायाची आणि धर्मनिरपेक्षतेची लढाई लढण्याची गरज असून, सामाजिक अभिसरणासाठी तरुणांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी येथे केले.प. बा. काकाणीनगर वाचनालयात ग्रंथालय सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘वसा विवेकाचा’ या विषयावर ते बोलत होते. अजय शाह अध्यक्षस्थानी होते. मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.दाभोलकर म्हणाले, विवेककारण हीच या देशाच्या भावी सुदृढ समाजाची पायाभरणी असून, धार्मिक अतिरेक, भ्रष्टाचार, जाती, धर्मभेद यांचे मूळ मानवाच्या अविवेकात आहे. आज विवेकवादाची गरज आहे. त्यामुळे धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करावी लागेल. धर्माची राजकीय दुकानदारी सुरू राहावी म्हणून काही धर्ममार्तंडांनी कर्मकांड आणि देवाला लाच देण्याच्या प्रतिमेमध्ये समाजाला अडकवून ठेवले आहे. धर्माची विवेकवादी चिकित्सा हीच विज्ञानाची खरी जननी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अठरा वर्षे झगडून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना बलिदान द्यावे लागले. यातून शासनाचा नाकर्तेपणा सिद्ध होतो. सामाजिक, राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पंचवीस वर्षांपासून व्यापकरीत्या कार्य करत आहे. जादूटोणाविरोधी कायदा संमत होऊन एकच वर्षात सव्वाशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे व यातच अंनिसचे यश आहे, असेही दाभोलकर यावेळी म्हणाले. प्रारंभी रविराज सोनार यांनी डॉ. दाभोलकर यांचा परिचय करून दिला. (प्रतिनिधी)