शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

शेतकऱ्यांच्या शोषणमुक्तीची गरज

By admin | Updated: July 10, 2017 23:21 IST

देसरडा : शेतकरी आंदोलनाविषयी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : : शेतकरी आत्महत्येची वाढती आकडेवारी पाहता सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह बाजारमुक्ती व शोषणमुक्तीचे धोरण स्वीकारण्याची गरज असून, विकासाच्या नावाखाली सुरू असलेले कृषी क्षेत्रातील कंपनीकरण थांबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केले.राज्य सुकाणू समितीच्या बैठकीसाठी नाशिक येथे आले असता प्रा. देसरडा यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करताना शेतकरी आंदोलनाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही वर्षांत शेतीचे औद्योगिकीकरण व रासायनिकीकरण झाल्याने शेती क्षेत्र संकटात सापडले आहे. नाशिकचा विचार केला तर येथे बहुपीक पद्धतीचा अवलंब केल्याने येथील गुंता अधिक आहे. यासाठी शेती संसाधनाचे उद्ध्वस्तीकरण, वातावरणातील बदल, बदलती बाजारातील समीकरणे, सरकार व बाजार एकत्रित होत शेतकऱ्यांची चाललेली लूट, अन्नसाखळी विखंडित झाली या कारणांसह सध्या वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली सरकारकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबविणे गरजेचे असल्याचे देसरडा यांनी सांगितले. या कारणांमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने पर्यायाने आत्महत्येकडे ढकलला जात आहे. या परिस्थितीस आजी-माजी सरकारची काही धोरणे कारणीभूत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा आणि आत्महत्येच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी कर्जमुक्ती व बाजारमुक्ती सोबतच शेतकऱ्यांची शोषणमुक्तीही गरजेची आहे. शेती क्षेत्रासंबंधी सरकारच्या आणि बाजाराच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे अडचणीची सरकारी धोरणे, बाजारप्रक्रियेतील समस्या व या दोहोंमधील साखळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी स्वायत्त होणे गरजेचे आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना कर्जाच्या, नफेखोरीच्या बाजाराच्या व सरकार आणि बाजारातील यंत्रणांकडून होणाऱ्या शोषणाच्या जोखडातून मुक्त करण्याची गरजही प्रा. देसरडा यांनी व्यक्त केली.