शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शेतकऱ्यांच्या शोषणमुक्तीची गरज

By admin | Updated: July 10, 2017 23:21 IST

देसरडा : शेतकरी आंदोलनाविषयी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : : शेतकरी आत्महत्येची वाढती आकडेवारी पाहता सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह बाजारमुक्ती व शोषणमुक्तीचे धोरण स्वीकारण्याची गरज असून, विकासाच्या नावाखाली सुरू असलेले कृषी क्षेत्रातील कंपनीकरण थांबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केले.राज्य सुकाणू समितीच्या बैठकीसाठी नाशिक येथे आले असता प्रा. देसरडा यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करताना शेतकरी आंदोलनाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही वर्षांत शेतीचे औद्योगिकीकरण व रासायनिकीकरण झाल्याने शेती क्षेत्र संकटात सापडले आहे. नाशिकचा विचार केला तर येथे बहुपीक पद्धतीचा अवलंब केल्याने येथील गुंता अधिक आहे. यासाठी शेती संसाधनाचे उद्ध्वस्तीकरण, वातावरणातील बदल, बदलती बाजारातील समीकरणे, सरकार व बाजार एकत्रित होत शेतकऱ्यांची चाललेली लूट, अन्नसाखळी विखंडित झाली या कारणांसह सध्या वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली सरकारकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबविणे गरजेचे असल्याचे देसरडा यांनी सांगितले. या कारणांमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने पर्यायाने आत्महत्येकडे ढकलला जात आहे. या परिस्थितीस आजी-माजी सरकारची काही धोरणे कारणीभूत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा आणि आत्महत्येच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी कर्जमुक्ती व बाजारमुक्ती सोबतच शेतकऱ्यांची शोषणमुक्तीही गरजेची आहे. शेती क्षेत्रासंबंधी सरकारच्या आणि बाजाराच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे अडचणीची सरकारी धोरणे, बाजारप्रक्रियेतील समस्या व या दोहोंमधील साखळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी स्वायत्त होणे गरजेचे आहे. जागतिक हवामान बदलाच्या संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना कर्जाच्या, नफेखोरीच्या बाजाराच्या व सरकार आणि बाजारातील यंत्रणांकडून होणाऱ्या शोषणाच्या जोखडातून मुक्त करण्याची गरजही प्रा. देसरडा यांनी व्यक्त केली.