शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्याची गरज : सचीन जोशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:23 IST

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होत नसल्याने मराठी भाषा सक्ती करावी लागत आहे. मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाल्यास विद्यार्थी स्वयंप्रेरणेने मराठीकडे वळतील आणि सक्ती करण्याची गरजच उरणार नाही असे मत शिक्षण शास्त्राचे अभ्यासक सचीन जोशी यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देमराठी भाषेसाठी पोषक वातावरण निर्मिती होणे आवश्यक  पालक, शिक्षक, समाजाच्या सहभागातून वातावरण निर्मिती शक्य शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी साहित्य संपदा उपलब्ध करण्याची गरज  विद्यार्थ्यांचा अभिप्रायातून बालसाहित्यिक पुरस्कारार्थी निवडणे आवश्यक 

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा मराठी भाषा सक्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्यस्थितीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य आहे. परंतु, विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नाही. त्यामुळे मराठी सक्ती करताना प्रथम विद्यार्थ्यांमध्येमराठी भाषेविषयी आवड निर्माण करण्याची गरज असल्याचे मत शिक्षण शास्त्राचे अभ्यासक सचीन जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले आहे. 

प्रश्न- इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जाण्यासाठी सक्तीच का करावी लागते ? जोशी : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविली जातच नाही असे नाही, शाळांना मान्यता देतानाच आठवीपर्यंत मराठी अनिवार्य केली आहे. त्यानुसार मराठी भाषा शिकविली जाते. परंतु, इंग्रजी शाळा प्राधान्याने इंग्रजी शिक्षणासाठीच सुरू झाल्याने इंग्रजीला प्राधान्यक्रम दिला जातो. पालकांचीही तशीच इच्छा असते. त्यामुळे मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांनाही गोडी निर्माण होत नाही. परिणामी  विद्यार्थी, पालक आणि शाळाही मराठीपासून दुरावत असल्याने अशा अशाप्रकारे सक्ती केली जाते. परंतु अशा प्रकारे सक्ती करताना विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण होण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.  प्रश्न -विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी काय करता येईल असे वाटते ?जोशी : शासनाकडून मराठी भाषा सक्तीसाठी घोषणा होतात. त्यासंदर्भात वेगवेगळे नियमही घालून दिले जातात. परंतु मराठी भाषेची विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जाताना दिसत नाही. महापालिके च्या मराठी माध्यमाच्या शाळांमधीव विद्यार्थ्यांचे मराठी चांगले असते.कारण त्यांना मराठीतील विविध गोष्टी ऐकायला वाचायला मिळतात. परंतु  अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषेतील साहित्यच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी मराठी वाचणे शिकत असले तरी त्यांचे लेखन व शब्दसंग्रह वाढू शकत नाही. त्यामुळे खासगी शाळांमध्येही मराठी साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पालकांनी  मुलांना मराठीतील साहित्य उपलब्ध करून देतानाच पालक, शिक्षक समाज आणि शासन अशा सर्व घटकांनी मराठी भाषेसाठी पोषक वातावरण निर्मीती करण्याची गरज आहे.प्रश्न-मराठी भाषेला पोषक वातावरण निर्मितीसाठी शासनस्तरावर काय प्रयत्न होणे अपेक्षित आहे?जोशी : विद्यार्थ्यांचे मराठी विषयी प्रेम वाढविण्यासाठी त्यांना साहित्यसंपदा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी बाल साहित्यिकांचा पुरस्कार निवडण्यासाठी शाले विद्यार्थ्यांचा अभिप्राय केंद्र स्थानी ठेवून निवड पद्धती राबवायला हवी. नामांकन मिळालेल्या साहित्यिकाची पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी देऊन त्यांच्याकडून अभिप्राय मागवून त्यानुसार पुरस्कार दिले गेले तर ओघानेच विद्यार्थ्यांचे वाचनही वाढेल.  त्याचप्रमाणे मराठी भाषा शिकविण्यासाठी उत्कृष्ठ शिक्षक तयार केले पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही आठवीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य आहे. त्यामुळे या शाळांमधील मुलांचे मराठी कसे आहेत ते जाणून घेण्यासाठी सरल पोर्टल विद्यार्थ्यांचे मराठी भाषा परीक्षेती गुण टाकणे अनिवार्य करण्यासोबतच इंग्रजी माध्यमात शिक्षण घेताना मराठी भाषेत गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक करणे आवश्यक आहे.  त्यातून आपोआपच विद्यर्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी  गोडी व आकर्षण निर्माण होईल. आणि एकदा की विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण होऊन ते स्वयंप्रेरणेने मराठीकडे वळतील.