शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक आंदोलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती स्वच्छ राहावी यासाठी गेल्या ...

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती स्वच्छ राहावी यासाठी गेल्या १२ वर्षांपासून नाशिकच्या नमामि गोदा फाैंडेशनच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. भारताचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांनी तर गोदावरी काशी स्वच्छ होऊ शकते, असा संदेश दिला आहे. भारतीय लोक नदीला माता मानतात. गोदावरी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे आणि ज्या नदीला आपण जीवनदायिनी किंवा माता मानतो, तिला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मध्यंतरी श्री श्री रविशंकर हे नाशिकला आले होते आणि गोदावरीची परिस्थिती पाहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ज्या नदीवर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत, अशा नदीचे संवर्धन हे लोकचळवळीतून झाले पाहिजे. महाराष्ट्रालाच नाही, तर सबंध भारताला आंदोलनांचा इतिहास आहे. आपण विविध मुद्द्यांवर आंदोलने करत असतो. त्यामुळे आता भारतातील सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी देखील सामूहिक आंदोलन उभारण्याची गरज आहे, असेही भुजबळ म्हणाले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, गायक शंकर महादेवन, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नियंत्रक वैधमापनशास्त्र रवींद्र सिंघल, नमामि गोदा फाैंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मान्यवर उपस्थित होते.

(फोटो २८ भुजबळ)