शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिक आंदोलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती स्वच्छ राहावी यासाठी गेल्या ...

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी, दक्षिण गंगा ही सहा राज्यांची जीवनदायिनी आहे. ती स्वच्छ राहावी यासाठी गेल्या १२ वर्षांपासून नाशिकच्या नमामि गोदा फाैंडेशनच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. भारताचे जलपुरुष म्हणून ओळख असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांनी तर गोदावरी काशी स्वच्छ होऊ शकते, असा संदेश दिला आहे. भारतीय लोक नदीला माता मानतात. गोदावरी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे आणि ज्या नदीला आपण जीवनदायिनी किंवा माता मानतो, तिला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मध्यंतरी श्री श्री रविशंकर हे नाशिकला आले होते आणि गोदावरीची परिस्थिती पाहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ज्या नदीवर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत, अशा नदीचे संवर्धन हे लोकचळवळीतून झाले पाहिजे. महाराष्ट्रालाच नाही, तर सबंध भारताला आंदोलनांचा इतिहास आहे. आपण विविध मुद्द्यांवर आंदोलने करत असतो. त्यामुळे आता भारतातील सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी देखील सामूहिक आंदोलन उभारण्याची गरज आहे, असेही भुजबळ म्हणाले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, गायक शंकर महादेवन, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नियंत्रक वैधमापनशास्त्र रवींद्र सिंघल, नमामि गोदा फाैंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मान्यवर उपस्थित होते.

(फोटो २८ भुजबळ)