शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज! कौटुंबिक सुसंवाद, खुली मैत्री; अभिव्यक्तीवर द्यावा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:29 IST

सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद, शिक्षण-नोकरीत वाढती जीवघेणी स्पर्धा, वरवरची मैत्री, अतिधाडसीपणात झालेली वाढ, नकार पचवण्याच्या संस्काराचा अभाव आदी कारणांमुळे आज लहानांपासून वृद्धांपर्यंत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.सामूहिक प्रयत्नांनी हे प्रमाण आटोक्यात आणणे गरजेचे असून त्यासाठी पालक, शिक्षक व मित्रमंडळींनी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे. ब्ल्यू व्हेल गेमचा विळखा, शेतीतील अपयश, शिक्षण-नोकरी, कामधंद्यातील अपयश, कर्जबाजारी, मानसिक छळ आदी विविध कारणांमुळे आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका न घेता आपल्या भावनांना वेळीच मोकळी वाट करून द्यावी, तज्ज्ञांची मदत घेत स्वत:च्या मनातील गुंता सोडवावा, असा सूर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.