शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समाजकेंद्रित होण्याची गरज:रावसाहेब कसबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:22 IST

नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान सोहळा

नाशिक : सध्याच्या स्थितीत लोक मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री होत असल्याने समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या समस्या व अडचणींमध्ये वाढ होत असून, मानवाने आत्मकेंद्री न राहता समाजकेंद्री होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त के ले आहे.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे रविवारी (दि.३) राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार २०१७-१८’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर वीरमाता नीलाताई आमले, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे उपसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर, माहिती तंत्रज्ञान संचालक श्रद्धा बेलसरे, उद्योजक अतुल वाघ आदी उपस्थित होते. रावसाहेब कसबे म्हणाले, समाजातील एक घटक व्यक्तिगतरीत्या भौतिक गरजांवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत असताना दुसरा घटक मात्र पायाभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित आहे. याचा विचार करून लोकांनी स्वयंस्फुर्तीने भौतिक गरजांवर मर्यादा आणण्याची गरज असल्याचे मत कसबे यांनी व्यक्त केले, तर समाजातील बोथट झालेल्या जाणिवा जागृत क रण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत श्रद्धा बेलसरे यांनी व्यक्त केले, तर पुरस्काराला उत्तर देताना समाजातील विविध घटांक ांमध्ये मानुसकीच्या जाणिवेचा ओलावा जागृत होण्याची गरज उद्योजक उज्ज्वला हावरे, प्रकाश बोरकर, आर. विमला आदींनी व्यक्त केली. प्रास्ताविक अभियानचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.पुरस्कारार्थींचा सन्मानसमाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा महाराष्ट्र राज्य जाणीव सांस्कृतिक अभियानतर्फे जाणीव पुरस्कारांनी करण्यात आला. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय एन. सूर्यवंशी, उद्योजक उज्ज्वला हावरे, नाशिक परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, महिला व बालविकास विभागाच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार, उद्योजक रेणुका पाटील,हेल्प एज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती यतिंद्र पगार, डॉ. मनीषा जगताप, नागपूरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पताचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर जळगाव वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पाटील, जलसंपदाचे सहायक अभियंता दिलीप काळे, उद्योजक कैलास देवरे आदींचा जाणीव पुरस्काराने गौरव करण्यात आला.