शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक सत्याग्रह करून दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळवून दिला. समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु, सध्या काही समाजविघातक शक्ती वेगवेगळ्या जातिधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या स्थितीवर मात करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून त्यांनी दिलेल्या राज्यघटनेचा आदर व पालन करण्याची गरज असल्याचा सूर अभिवादन सभेत उमटला.गोदाघाटावरील गौरी पटांगणावर काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह भूमिपुत्र समितीतर्फे आयोजित अभिवादन सभेत वेगवेगळ्या समाज व संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनक्रांती परिषदेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्यासह व्यासपीठावर रिपाइं गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी महापौर अशोक दिवे, राष्ट्रीय नेते तानसेन नन्नावरे, अण्णासाहेब कटारे, नाना भालेराव, गणेश उन्हवणे, आनंद सोनवणे, सचिन खरात, नगरसेवक राहुल दिवे, प्रियंका घाटे, शांताबाई हिरे आदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी वामनदादा कर्डक यांच्या विविध भीमगीतांसह बुद्धगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. स्वागताध्यक्ष किशोर घाटे यांनी प्रास्ताविक, तर दीपक नन्नावरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश पगारे, मुकुंद गांगुर्डे, कै लास तेलोरे, रोषन घाटे, योगेश नन्नावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या सत्याग्रहासह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना खुले करून देणाºया सत्याग्रहाचे वर्णन ‘दिले दलितांना करून खुले, काळाराम मंदिर, चवदार तळे’ यासारख्या विविध बुद्ध व भीमगीतांच्या माध्यमातून गायक संतोष जोंधळ यांनी केले. त्यांच्यासह संगीत मंडळाने सादर केलेल्या भीमगीतांवर उपस्थितांना ठेका धरायला लावला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर