शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

By admin | Updated: January 20, 2017 23:57 IST

मुक्त विद्यापीठ : तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज अपूर्ण असल्याने त्यांचा प्रवेश धोक्यात आला आहे. अर्ज दाखल करताना अर्जात अनेक त्रुटी राहिल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे, तर कागदपत्रे अ‍ॅटेच करूनही संगणकावर नसतील तर त्यास विद्यार्थी जबाबदार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.  सन २०१६-१७ च्या शिक्षणक्रमासाठी मुक्त विद्यापीठाने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. यातील सुमारे १३,७८० विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्णतेच्या कारणास्तव बाद करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना आता २५ तारखेपर्यंत अर्जांची पूर्तता करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना ३०० रुपये भरावे लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रक्रिया पूर्ण केलेली असताना संकेतस्थळावर माहिती उमटत नसेल तर त्यास विद्यार्थ्यांचा दोष काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. अर्ज अपूर्ततेचे कारण देताना विद्यापीठाने शैक्षणिक प्रमाणपत्र अ‍ॅटेच नसल्याचे कारण सांगितले आहे तर काही विद्यार्थ्यांना अ‍ॅटेच केलेले कागदपत्र अदृश्य स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. हा सर्व तांत्रिक भाग असताना विद्यार्थ्यांनी ३०० रुपयांचा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.  अर्जातील त्रुटी दुरुस्तीबाबतचा विनंती अर्ज, प्रवेश अर्जाची प्रोफाइल प्रत, प्रवेश पात्रतेची कागदपत्रे, बॅँक चलन आणि त्रुटींची दुरुस्ती करण्याचे शुल्क ३०० आकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी त्यास हरकत घेतली आहे. अर्ज पडताळणी करताना आढळेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अडचणीत आलेले प्रवेश दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठाने संधी दिल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे त्रुटींची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले असून, सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतीदेखील स्पीड पोस्टाने पाठविण्याचे बंधनकारक करण्यात आल आहे. यावरून विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे.  ई-मेलने अर्जाची पूर्तता करण्याते म्हटले असतानाही पुन्हा स्पीड पोस्टाने कागदपत्रे मागविण्यात आल्यामुळे विद्यापीठाला आपल्या तांत्रिक यंत्रणेवर विश्वास नसल्याचा आरोप विद्यार्थीवर्ग करीत आहेत. (प्रतिनिधी)