शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

By admin | Updated: January 20, 2017 23:57 IST

मुक्त विद्यापीठ : तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज अपूर्ण असल्याने त्यांचा प्रवेश धोक्यात आला आहे. अर्ज दाखल करताना अर्जात अनेक त्रुटी राहिल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे, तर कागदपत्रे अ‍ॅटेच करूनही संगणकावर नसतील तर त्यास विद्यार्थी जबाबदार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.  सन २०१६-१७ च्या शिक्षणक्रमासाठी मुक्त विद्यापीठाने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. यातील सुमारे १३,७८० विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्णतेच्या कारणास्तव बाद करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना आता २५ तारखेपर्यंत अर्जांची पूर्तता करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना ३०० रुपये भरावे लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रक्रिया पूर्ण केलेली असताना संकेतस्थळावर माहिती उमटत नसेल तर त्यास विद्यार्थ्यांचा दोष काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. अर्ज अपूर्ततेचे कारण देताना विद्यापीठाने शैक्षणिक प्रमाणपत्र अ‍ॅटेच नसल्याचे कारण सांगितले आहे तर काही विद्यार्थ्यांना अ‍ॅटेच केलेले कागदपत्र अदृश्य स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. हा सर्व तांत्रिक भाग असताना विद्यार्थ्यांनी ३०० रुपयांचा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.  अर्जातील त्रुटी दुरुस्तीबाबतचा विनंती अर्ज, प्रवेश अर्जाची प्रोफाइल प्रत, प्रवेश पात्रतेची कागदपत्रे, बॅँक चलन आणि त्रुटींची दुरुस्ती करण्याचे शुल्क ३०० आकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी त्यास हरकत घेतली आहे. अर्ज पडताळणी करताना आढळेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अडचणीत आलेले प्रवेश दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठाने संधी दिल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे त्रुटींची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले असून, सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतीदेखील स्पीड पोस्टाने पाठविण्याचे बंधनकारक करण्यात आल आहे. यावरून विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे.  ई-मेलने अर्जाची पूर्तता करण्याते म्हटले असतानाही पुन्हा स्पीड पोस्टाने कागदपत्रे मागविण्यात आल्यामुळे विद्यापीठाला आपल्या तांत्रिक यंत्रणेवर विश्वास नसल्याचा आरोप विद्यार्थीवर्ग करीत आहेत. (प्रतिनिधी)