शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहर बससेवेच्या वादात राष्ट्रवादीची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:49 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून परिवहन महामंडळ आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू असून, आजवर महासभेने सदरचे प्रस्ताव ठोकरून लावले असताना आता राष्टÑवादीने बससेवा मनपाकडे वर्ग करण्याची भूमिका घेतल्याने या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून परिवहन महामंडळ आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू असून, आजवर महासभेने सदरचे प्रस्ताव ठोकरून लावले असताना आता राष्टÑवादीने बससेवा मनपाकडे वर्ग करण्याची भूमिका घेतल्याने या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी म्हटले आहे, शहर बससेवा नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर पालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाºयांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. शहर बससेवेच्या आजवर दररोज १९० ड्युटी असत. त्यापैकी सध्या ७० ड्युटी बंद झालेल्या आहेत. म्हणजेच एका ड्युटीच्या आठ फेºयांप्रमाणे एकूण ५६० बसफेºया बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन्तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या सुरू असलेल्या बसेसलाही तुफान गर्दी होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर एस. टी. महामंडळाने नाशिक शहरातील बसफेºया कमी केल्यामुळे नादुरु स्त बसेसची संख्या वाढल्याने काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतले. त्यामुळे दि. २२ आॅगस्ट रोजी एस.टी. कर्मचाºयांनी अचानक आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली होती. परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी असल्यामुळे नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्र म देऊन शहर बससेवेच्या फेºया पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. तसेच शहरातील प्रवासी वेठीस धरले जात असल्यामुळे शहर बससेवा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदर सेवा महानगरपालिकेकडे वर्ग करावी किंवा फेºया पूर्ववत सुरू करण्याबाबत आपण स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शहर बससेवा मनपाने ताब्यात घेण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणारशहर बससेवा ताब्यात घेणे असो अथवा बीआरटीस प्रकल्प याबाबत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत व्यवहार्यता तपासून पाहूनच उचित निर्णय घेतला जाईल. महापालिकेने बससेवा चालवावी की नाही, हे पूर्णपणे महापालिकेवर निर्भर आहे. बससेवा चालविणे बंधनकारक नाही. ते ऐच्छिक आहे. बससेवा चालविण्याबाबतचे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यांचा अभ्यास करूनच निर्णय होईल. घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही आणि महापालिकेचे नुकसान होऊ दिले जाणार नाही.- अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपा