शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

शहर बससेवेच्या वादात राष्ट्रवादीची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:49 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून परिवहन महामंडळ आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू असून, आजवर महासभेने सदरचे प्रस्ताव ठोकरून लावले असताना आता राष्टÑवादीने बससेवा मनपाकडे वर्ग करण्याची भूमिका घेतल्याने या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून परिवहन महामंडळ आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू असून, आजवर महासभेने सदरचे प्रस्ताव ठोकरून लावले असताना आता राष्टÑवादीने बससेवा मनपाकडे वर्ग करण्याची भूमिका घेतल्याने या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी म्हटले आहे, शहर बससेवा नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर पालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाºयांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. शहर बससेवेच्या आजवर दररोज १९० ड्युटी असत. त्यापैकी सध्या ७० ड्युटी बंद झालेल्या आहेत. म्हणजेच एका ड्युटीच्या आठ फेºयांप्रमाणे एकूण ५६० बसफेºया बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन्तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या सुरू असलेल्या बसेसलाही तुफान गर्दी होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर एस. टी. महामंडळाने नाशिक शहरातील बसफेºया कमी केल्यामुळे नादुरु स्त बसेसची संख्या वाढल्याने काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतले. त्यामुळे दि. २२ आॅगस्ट रोजी एस.टी. कर्मचाºयांनी अचानक आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली होती. परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी असल्यामुळे नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्र म देऊन शहर बससेवेच्या फेºया पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. तसेच शहरातील प्रवासी वेठीस धरले जात असल्यामुळे शहर बससेवा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदर सेवा महानगरपालिकेकडे वर्ग करावी किंवा फेºया पूर्ववत सुरू करण्याबाबत आपण स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शहर बससेवा मनपाने ताब्यात घेण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणारशहर बससेवा ताब्यात घेणे असो अथवा बीआरटीस प्रकल्प याबाबत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत व्यवहार्यता तपासून पाहूनच उचित निर्णय घेतला जाईल. महापालिकेने बससेवा चालवावी की नाही, हे पूर्णपणे महापालिकेवर निर्भर आहे. बससेवा चालविणे बंधनकारक नाही. ते ऐच्छिक आहे. बससेवा चालविण्याबाबतचे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यांचा अभ्यास करूनच निर्णय होईल. घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही आणि महापालिकेचे नुकसान होऊ दिले जाणार नाही.- अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपा