शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

राष्ट्रवादीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन शेतमालाला हमीभाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:18 IST

नाशिकरोड : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले.

ठळक मुद्देहल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही

नाशिकरोड : केंद्रात व राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या शासनाने शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या उत्तर महाराष्ट्र विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ नाशिक येथे हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा ठेवण्यात आली होती. दरम्यान शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांची राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत जाधव, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तटकरे साडेतीन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीसारखे संकट आले. यामध्ये शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असूनही शासनाने शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही. बोंड अळीमुळे कापूस उत्पादक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असूनही शासनाने उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची खिल्ली उडविली आहे. तसेच बेरोजगारी वाढल्याने तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तर महागाई दिवसेंदिवस वाढत असूनही शासन ढिम्मपणे बसले असून काहीच करत नसून जनतेच्या भावनांची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत असून, सरकार कोणतीच चौकशी करीत नाही. बीड जिल्ह्यात जलयुक्तमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे काही अधिकाºयांना निलंबित केले आहे. मात्र सरकारने केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, मनोहर कोरडे, दीपक वाघ, चैतन्य देशमुख, अंबादास खैरे, वैभव देवरे, गौरव गोवर्धने, निवृत्ती कापसे, दिलीप बनकर, वसीम शेख, प्रशांत वाघ, दौलत त्रिभुवन, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.