शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी कॉँग्रेसला हवेय मनगटात ‘बळ’

By admin | Updated: January 13, 2017 00:28 IST

भाजपातर्फे उमेदवारांचा शोध : अध्यक्षपदाचा शिवधनुष्य पेलण्यास सेना उत्सुक

गणेश धुरी नाशिकजिल्हा परिषदेत गेल्या तीन पंचवार्षिकपासून एकहाती सत्ता मिळविणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला नेतृत्वाअभावी काहीसे कमजोर झाल्याचे चित्र आहे. याचे प्रमुख कारण जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता येण्यामागे एकखांबी नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच असल्याचे नाकारता येणार नाही. तूर्तास ते कायदेशीर कचाट्यात सापडल्याने राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी व आगामी निवडणुकांची लढाई जिंकण्यासाठी मनगटात ‘बळ’ हवे आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेले नेटवर्क आणि कार्यकर्त्यांची फौज पाहता पांडुरंग राऊत यांच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर भगवा फडविण्यासाठी शिवसेना जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. अर्थात सत्ता असल्याने त्यांना उमेदवार मिळतीलही, मात्र उमेदवारीचे विजयात रूपांतर करणारे इच्छुक मिळतीलच याची शाश्वती नाही. भाजपाच्या जिल्हा नेतृत्वाने तसेही ग्रामीण भागात भाजपाला जास्त जोर द्यावा लागेल, असे याआधीही कबूल केले आहे. शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या कॉँग्रेसला मिनी मंत्रालयात खूपच खडतर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यांचे १४ सदस्य असताना नाशिक महापालिकेतील मनसेप्रमाणेच जिल्हा परिषदेत कॉँग्रेसला गळती लागली आहे. माजी आमदार अ‍ॅड. अनिलकुमार अहेर यांना तर त्यांच्या घरातूनच बंधू विलास अहेर यांच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सामना करण्याची वेळ आली आहे. इगतपुरीत संदीप गुळवे शिवसेनेत गेल्याने आमदार निर्मला गावितांना इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातून कॉँग्रेसच्या जागा टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. माकप त्यांच्या सुरगाणा तालुक्यापुरता मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. नाही म्हणायला दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर येथूनही माकपाला एखाद दोन जागांची अपेक्षा आहे. मनसेचे तीन सदस्य मागील पंचवार्षिकमध्ये निवडून आले होते. मात्र यंदा खाते खोलण्यासाठीही रेल्वे इंजिनाला जोर लावावा लागेल. परंतु मागील वेळेची तीन सदस्यांची पुनरावृत्ती मनसेला अवघड आहे.