शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

राष्ट्रवादीकडून जिल्हा प्रशासनाला भाजीपाला ‘भेट

By admin | Updated: May 27, 2017 00:36 IST

राष्ट्रवादी जिल्हा कॉँग्रेसने शुुक्रवारी (दि. २६) जिल्हा प्रशासनाला कोबी, टमाट्यांसह शेतमाल भेट देत आंदोलन केले.

’लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तीन वर्षांत एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी जिल्हा कॉँग्रेसने शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप करीत शुुक्रवारी (दि. २६) जिल्हा प्रशासनाला कोबी, टमाट्यांसह शेतमाल भेट देत आंदोलन केले.दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजीपाला सोबत नेत तो जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्याची तयारी केली असताना, पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यानंतर दीड तास राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नही चलेगी, नही चलेगी, सरकार की दादागिरी नही चलेगी’ घोषणाबाजी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना भाजीपाल्यासह आत सोडण्यात आले.केंद्र सरकारची तीन वर्षे होऊनदेखील जनतला अच्छे दिन आले नसल्याचे सांगत या सरकारने जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप आंदोलनावेळी मनोेगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर भाजीपाल्याच्या टोपल्या घेत भाजीपाला विक्रीचे आंदोलन केले. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी दिली पाहिजे, शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे, आगामी खरीप हंगामाच्या तोेंडावर जिल्हा बॅँकांना पतपुरवठा करून शेतकऱ्यांना खरिपासाठी तातडीचे कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे आदी मागण्या यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या. या आंदोलनात माजी आमदार दिलीप बनकर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, अर्पणा खोसकर, डॉ. सयाजी गायकवाड, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, हिरामण खोसकर, सिद्धार्थ वनारसे, यशवंत ढिकले, सुरेश कमानकर, सुनील वाजे, वैभव देवरे, दीपक वाघ, पुरुषोत्तम कडलग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.