शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मानोरी परिसरात पावसाने पिकांना नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 19:25 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्दे शेतात कामकरणारे शेतकरी आणि महिला वर्गांची मोठी धावपळ उडाली होती.

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मका, सोयाबीनचे पीक कडक उन्हाने काहीसे कोमजण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्याने दमट वातावरण निर्माण झाले होते.शनिवारी (दि.२०) दुपारी मध्यम पावसाने कमबॅक केल्याने मका, सोयाबीनच्या पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे. सकाळ पासूनच उन्हाची तीव्रता नेहमी पेक्षा जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात दमट वातावरण होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्याने विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. यावेळी शेतात कामकरणारे शेतकरी आणि महिला वर्गांची मोठी धावपळ उडाली होती.मका, सोयाबीन निंदणीची सुरू असलेली कामे पावसामुळे अर्ध्यावर सोडून शेतकरी घरी परतले होते. यंदा येवला तालुक्यातील पश्चिम भागात समाधान कारक हा वेळेत पाऊस पडत असल्याने निंदणी, खुरपणी देखील मोठ्या हौशेने सुरू असून अमेरिकन लष्करी अळीमुळे मात्र शेतकभयभित झाले आहेत.गत वर्षी दुष्काळाशी सामना करून यंदा लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची अवस्था जणू आगीतून सुटून फोफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. मानोरी, पिंपळगाव लेप, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, जळगाव नेऊर आदी परिसरात शेतकरी लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठी मक्याला महागडी औषधे फवारणी करत आहेत. आत्तापर्यंत दोनदा औषध फवारणी केली असून काही ठिकाणी अळी जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा दमदार पाऊस पडूनही मका हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.