शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

निसर्गाने झोडले, प्रशासनाने नाडले!

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

बाळासाहेब सोमासे ल्ल जळगाव नेऊरयेवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील डोंगरगाव, सावरगाव व खिर्डीसाठे या गावांना प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेचा असाच सामना करावा लागत असून, त्यामुळे येथील धरण तसेच तलावांचा डागडुजी करण्यासाठीचा ५७ लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे तर उत्तर-पूर्व भागास मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील डोंगरगाव लघु तलावात येण्याची दशकानुदशके वाट पाहत आहे. डोंगरगावी धरणाला पाझरडोंगरगाव येथील धरणात दगडाच्या पिचिंग लेव्हलपर्यंत पाणी येताच खालच्या बाजूस पाण्याची गळती होते. त्यामुळे धरण रिकामे होते. या पाण्याची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. गतवर्षी मेरीच्या अभियंत्यांच्या पथकाने गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली. मात्र कार्यवाही झालेली नाही. मांजरपाडा प्रकल्पाचे पाहणी या धरणात येण्यापूर्वी तरी गळती थांबविली जावी, अशी मागणी आहे.सद्यस्थितीत सदर धरण सुमारे ५० टक्के गाळाने भरले आहे. त्यामुळे साठवण क्षमता घटली आहे. शासकीय पातळीवर धरणातील गाळ काढण्याची कृती होत नाही. शेतकरी स्वखर्चाने शेतात टाकण्यासाठी गाळ काढतात तेवढ्यावर धरणास जीवदान मिळते. सांडव्याची दगडी भिंत जागोजागी फुटली असून, तिची दुरुस्ती केली जात नाही. धरणासाठी रखवालदार नियुक्त नाही. चौकीदार निवासाच्या केवळ भिंती शिल्लक असून, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या धरणात व नदीपात्रात अनेक खासगी विहिरी असून, या कागदोपत्री खासगी क्षेत्रावर दर्शविलेल्या असल्या तरी त्या धरणक्षेत्रात व नदीपात्रात आहेत. या विहिरींद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बेकायदा उपसा होतो. त्यामुळे धरणातील पाणी आटते. शिवाय पाणीपट्टीची आकारणी होत नसल्याने पाटबंधारे खात्याचे उत्पन्नही बुडते.सावरगावचीही तीच तऱ्हासावरगाव येथे १९८५ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणातही मोठ्या प्रमाणात गाळ साठला होत्या. मागील वर्षी माजी सभापती संभाजी पवार यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी व लोकसहभागातून गाळ काढला. त्यामुळे साठवणक्षमता वाढली असली तरी खोली वाढविणे, साठवण क्षमता वाढविणे, झुडपे तोडणे यासारखे उपाय गरजेचे आहे. पावसामुळे धरणावरील मातीचे वहन होऊ नये म्हणून धरणावर मुरमाचा थर दिल्यास धरणाचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.खिर्डीसाठेचा तलाव कोरडापालखेड पाटबंधारे खात्याच्या पूर्व विभागाच्या नियंत्रणाखालील खिर्डीसाठे येथे असलेल्या तलावाचा लाभ खिर्डीसाठे, नगरसूल, मातुलठाण, वडगाव, नागडे या गावांना होतो. गतसाली लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यात आला. या धरणाची डागडूग, दुरुस्ती, गाळ काढणे, खोली वाढविणे, धरणाची उंची वाढविणे हे उपाय धरणाची साठवण क्षमता वाढवू शकते.