शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

निसर्गाने झोडले, प्रशासनाने नाडले!

By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

बाळासाहेब सोमासे ल्ल जळगाव नेऊरयेवला तालुक्यावर निसर्गाची जशी अवकृपा आहे तशीच प्रशासनाचीही खप्पामर्जी आहे आणि त्यामुळेच येथील जनतेला सातत्याने टाहो फोडूनही तहान भागविण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील डोंगरगाव, सावरगाव व खिर्डीसाठे या गावांना प्रशासकीय पातळीवरील उदासीनतेचा असाच सामना करावा लागत असून, त्यामुळे येथील धरण तसेच तलावांचा डागडुजी करण्यासाठीचा ५७ लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे तर उत्तर-पूर्व भागास मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील डोंगरगाव लघु तलावात येण्याची दशकानुदशके वाट पाहत आहे. डोंगरगावी धरणाला पाझरडोंगरगाव येथील धरणात दगडाच्या पिचिंग लेव्हलपर्यंत पाणी येताच खालच्या बाजूस पाण्याची गळती होते. त्यामुळे धरण रिकामे होते. या पाण्याची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली नाही. गतवर्षी मेरीच्या अभियंत्यांच्या पथकाने गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली. मात्र कार्यवाही झालेली नाही. मांजरपाडा प्रकल्पाचे पाहणी या धरणात येण्यापूर्वी तरी गळती थांबविली जावी, अशी मागणी आहे.सद्यस्थितीत सदर धरण सुमारे ५० टक्के गाळाने भरले आहे. त्यामुळे साठवण क्षमता घटली आहे. शासकीय पातळीवर धरणातील गाळ काढण्याची कृती होत नाही. शेतकरी स्वखर्चाने शेतात टाकण्यासाठी गाळ काढतात तेवढ्यावर धरणास जीवदान मिळते. सांडव्याची दगडी भिंत जागोजागी फुटली असून, तिची दुरुस्ती केली जात नाही. धरणासाठी रखवालदार नियुक्त नाही. चौकीदार निवासाच्या केवळ भिंती शिल्लक असून, त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या धरणात व नदीपात्रात अनेक खासगी विहिरी असून, या कागदोपत्री खासगी क्षेत्रावर दर्शविलेल्या असल्या तरी त्या धरणक्षेत्रात व नदीपात्रात आहेत. या विहिरींद्वारे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा बेकायदा उपसा होतो. त्यामुळे धरणातील पाणी आटते. शिवाय पाणीपट्टीची आकारणी होत नसल्याने पाटबंधारे खात्याचे उत्पन्नही बुडते.सावरगावचीही तीच तऱ्हासावरगाव येथे १९८५ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणातही मोठ्या प्रमाणात गाळ साठला होत्या. मागील वर्षी माजी सभापती संभाजी पवार यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी व लोकसहभागातून गाळ काढला. त्यामुळे साठवणक्षमता वाढली असली तरी खोली वाढविणे, साठवण क्षमता वाढविणे, झुडपे तोडणे यासारखे उपाय गरजेचे आहे. पावसामुळे धरणावरील मातीचे वहन होऊ नये म्हणून धरणावर मुरमाचा थर दिल्यास धरणाचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.खिर्डीसाठेचा तलाव कोरडापालखेड पाटबंधारे खात्याच्या पूर्व विभागाच्या नियंत्रणाखालील खिर्डीसाठे येथे असलेल्या तलावाचा लाभ खिर्डीसाठे, नगरसूल, मातुलठाण, वडगाव, नागडे या गावांना होतो. गतसाली लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्यात आला. या धरणाची डागडूग, दुरुस्ती, गाळ काढणे, खोली वाढविणे, धरणाची उंची वाढविणे हे उपाय धरणाची साठवण क्षमता वाढवू शकते.