शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

येवल्यात राष्टÑवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:52 IST

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करणे या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देतहसील कार्यालय : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करणे या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यात येवल्याचा समावेश नाही त्यामुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी वक्त्यांनी केली.यावेळी अंबादास बनकर, अरुण थोरात, वसंतराव पवार, यशवंत शिरसाठ, अकबर शाह, विजय पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव मढवई, उषाताई शिंदे, संजय बनकर, हरिभाऊ जगताप, रामदास काळे, महेंद्र काले, किसनराव धनगे, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अशोक मेंगाणे, दीपक लोणारी, अविनाश कुक्कर, हुसेन शेख, भाऊसाहेब बोचरे, विष्णू कºहेकर, रियाज मुलानी, साहेबराव आहेर, अनिल दारुंटे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, अलका जेजुरकर, समिना शेख, विमलबाई शाह, तुळशीराम कोकाटे उपस्थित होते.सक्तीची कर्ज, वीजबिल वसुली थांबवायेवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवलाविधानसभा मतदारसंघात अतिशय कमी पर्जन्यमान झाल्याने पाण्याअभावी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत शासनाने जाचक अटी लावून येवला तालुका दुष्काळी यादीतून वगळण्यात आला आहे. पालखेड धरणातून सिंचनाचे दोन आवर्तन शक्य असतानादेखील प्रशासन पाणी देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच अशा भयानक परिस्थितीतदेखील विद्युत महावितरण कंपनी सक्तीने वीजबिल वसुली करत आहे. बॅँकादेखील सक्तीची कर्ज वसुली करीत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.