शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

येवल्यात राष्टÑवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:52 IST

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करणे या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देतहसील कार्यालय : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

येवला : वाढती महागाई, पाणीटंचाई, शासनाची शेतकऱ्यांकडून सुरू असलेली सक्तीची वीजबिल व कर्जवसुली, पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न, पालखेड कालव्याचे आवर्तनाबाबत अनिश्चितता, येवला तालुका दुष्काळी जाहीर करणे, मांजरपाड्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करणे या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यात येवल्याचा समावेश नाही त्यामुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्याची मागणी वक्त्यांनी केली.यावेळी अंबादास बनकर, अरुण थोरात, वसंतराव पवार, यशवंत शिरसाठ, अकबर शाह, विजय पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, साहेबराव मढवई, उषाताई शिंदे, संजय बनकर, हरिभाऊ जगताप, रामदास काळे, महेंद्र काले, किसनराव धनगे, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अशोक मेंगाणे, दीपक लोणारी, अविनाश कुक्कर, हुसेन शेख, भाऊसाहेब बोचरे, विष्णू कºहेकर, रियाज मुलानी, साहेबराव आहेर, अनिल दारुंटे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, अलका जेजुरकर, समिना शेख, विमलबाई शाह, तुळशीराम कोकाटे उपस्थित होते.सक्तीची कर्ज, वीजबिल वसुली थांबवायेवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवलाविधानसभा मतदारसंघात अतिशय कमी पर्जन्यमान झाल्याने पाण्याअभावी तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत शासनाने जाचक अटी लावून येवला तालुका दुष्काळी यादीतून वगळण्यात आला आहे. पालखेड धरणातून सिंचनाचे दोन आवर्तन शक्य असतानादेखील प्रशासन पाणी देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच अशा भयानक परिस्थितीतदेखील विद्युत महावितरण कंपनी सक्तीने वीजबिल वसुली करत आहे. बॅँकादेखील सक्तीची कर्ज वसुली करीत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.