शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

 कवडीमोल भावाने द्राक्षपंढरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:37 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्र ी करावी लागत आहे.

ठळक मुद्देउत्पादक हवालदिल : मागणी नसल्याने घसरणभाजीपाला, कांद्यापाठोपाठ द्राक्षांकडूनही निराशाच

बाजीराव कमानकर ।सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्र ी करावी लागत आहे.कांद्यापाठोपाठ द्राक्षाने कमरडे मोडल्यानेयंदाचे वर्ष शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या मानगुटीवर बसणारे निघाल्याने शेतकरी पुरता हतबल झालाआहे. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी बागेत फिरकत नसल्याने द्राक्षे घेतं का कुणी, द्राक्ष घेतं का कुणीअशी बळजबरी करण्याची वेळ बागायतदारांवरआली आहे, तर ज्यांची बागा सुरू आहे. त्यांनाअवघे १५ ते २० रुपये किलो इतका कमी भाव मिळत आहे.निर्यातक्षम द्राक्ष ३५ ते ४० रुपये किलो दराने खरेदी सुरू असली तरी एक एकर बागेतून अवघा ४० टक्के माल हार्वेस्टिंग करून शिल्लक राहिलेल्या माल विक्री होत नाही तर काही बागा व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नसल्याने बेदाणा बनविण्यासाठी १० ते १४ रुपये भावात विकावा लागत असल्याने कधी नव्हे असा वाईट प्रसंग शेतकºयांवर आला आहे.द्राक्ष चांगले उत्पादन देणारे एकमेव पीक असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंबासाठी येणारा दैनंदिन खर्च, दुकानदारांची देणेदारी असे सर्व गणित अवलंबून असते. यंदाचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. - कैलास डेर्ले, शिंगवेद्राक्ष कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. उधारीत घेतलेल्या औषधांची वसुली थांबली आहे. शेतकरी दुकानाकडे पाठ फिरवत असल्याने दुकानदारी तोट्यात आली आहे. औषध कंपन्यांनी मात्र तगादा लावला आहे.- शरद शिंदे, औषध विक्रेतेकांद्यापाठोपाठ द्राक्षाच्या कोसळणाºया बाजारभावाने शेतकºयांचे आर्थिक कमरडे मोडले. दोन पिकात शेतकरी भुईसपाट झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे कर्ज वाढले आहे. दुकानदार उधारीसाठी तगादा लावत आहे. सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही, कर्जमाफीच्या नियमात बसलो नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. - सुदाम खालकर, द्राक्ष उत्पादक शेतकरीद्राक्षबागांकडे व्यापाºयांची पाठकाळी कसदार जमीन, मुबलक पाणी, शेतकºयांना कर्ज देणाºया बँक असल्याने तालुक्यातील ७० टक्के शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळाले आहेत. तरु ण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम द्राक्ष पिकवत आहे.द्राक्ष लागवडीसाठी एकरी किमान पाच लाख रु पये खर्च येतो. त्यानंतर उत्पादनासाठी वर्षाला एकरी २ ते अडीच लाख रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे महागडे आणि पैसे मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते.यंदा कोणत्याही भागात गारपीट झाली नाही. बेमोसमी पाऊस पडला नाही. त्यामुळे द्राक्षाचे भरघोस उत्पादन निघाले, शिवाय उत्तर भारतात सर्वत्र थंडीची लाट आली होती. अजूनही अनेक भागात हिमवृष्टी सुरू आहे त्यामुळे द्राक्षाला उठाव नाही.