शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

 कवडीमोल भावाने द्राक्षपंढरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:37 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्र ी करावी लागत आहे.

ठळक मुद्देउत्पादक हवालदिल : मागणी नसल्याने घसरणभाजीपाला, कांद्यापाठोपाठ द्राक्षांकडूनही निराशाच

बाजीराव कमानकर ।सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या द्राक्षाला कवडीमोल भाव मिळत असल्याने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस आणि बेमोसमी गारपीट यापासून वाचलेले द्राक्ष यंदा कमी भावात विक्र ी करावी लागत आहे.कांद्यापाठोपाठ द्राक्षाने कमरडे मोडल्यानेयंदाचे वर्ष शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या मानगुटीवर बसणारे निघाल्याने शेतकरी पुरता हतबल झालाआहे. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी बागेत फिरकत नसल्याने द्राक्षे घेतं का कुणी, द्राक्ष घेतं का कुणीअशी बळजबरी करण्याची वेळ बागायतदारांवरआली आहे, तर ज्यांची बागा सुरू आहे. त्यांनाअवघे १५ ते २० रुपये किलो इतका कमी भाव मिळत आहे.निर्यातक्षम द्राक्ष ३५ ते ४० रुपये किलो दराने खरेदी सुरू असली तरी एक एकर बागेतून अवघा ४० टक्के माल हार्वेस्टिंग करून शिल्लक राहिलेल्या माल विक्री होत नाही तर काही बागा व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नसल्याने बेदाणा बनविण्यासाठी १० ते १४ रुपये भावात विकावा लागत असल्याने कधी नव्हे असा वाईट प्रसंग शेतकºयांवर आला आहे.द्राक्ष चांगले उत्पादन देणारे एकमेव पीक असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित अवलंबून असते. मुलांचे शिक्षण, लग्न, कुटुंबासाठी येणारा दैनंदिन खर्च, दुकानदारांची देणेदारी असे सर्व गणित अवलंबून असते. यंदाचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. - कैलास डेर्ले, शिंगवेद्राक्ष कवडीमोल भावात विक्र ी होत असल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. उधारीत घेतलेल्या औषधांची वसुली थांबली आहे. शेतकरी दुकानाकडे पाठ फिरवत असल्याने दुकानदारी तोट्यात आली आहे. औषध कंपन्यांनी मात्र तगादा लावला आहे.- शरद शिंदे, औषध विक्रेतेकांद्यापाठोपाठ द्राक्षाच्या कोसळणाºया बाजारभावाने शेतकºयांचे आर्थिक कमरडे मोडले. दोन पिकात शेतकरी भुईसपाट झाला आहे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे कर्ज वाढले आहे. दुकानदार उधारीसाठी तगादा लावत आहे. सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही, कर्जमाफीच्या नियमात बसलो नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. - सुदाम खालकर, द्राक्ष उत्पादक शेतकरीद्राक्षबागांकडे व्यापाºयांची पाठकाळी कसदार जमीन, मुबलक पाणी, शेतकºयांना कर्ज देणाºया बँक असल्याने तालुक्यातील ७० टक्के शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळाले आहेत. तरु ण पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम द्राक्ष पिकवत आहे.द्राक्ष लागवडीसाठी एकरी किमान पाच लाख रु पये खर्च येतो. त्यानंतर उत्पादनासाठी वर्षाला एकरी २ ते अडीच लाख रु पयांचा खर्च येतो. त्यामुळे महागडे आणि पैसे मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते.यंदा कोणत्याही भागात गारपीट झाली नाही. बेमोसमी पाऊस पडला नाही. त्यामुळे द्राक्षाचे भरघोस उत्पादन निघाले, शिवाय उत्तर भारतात सर्वत्र थंडीची लाट आली होती. अजूनही अनेक भागात हिमवृष्टी सुरू आहे त्यामुळे द्राक्षाला उठाव नाही.