शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरू

By admin | Updated: August 5, 2015 22:25 IST

रेल्वे अपघात : मध्य प्रदेशातील घटनेमुळे रेल्वेसेवा विस्कळीत

नाशिकच्या गाड्या सुरळीत सुरूनाशिकरोड : मध्य प्रदेशातील हरदा रेल्वेस्थानकाजवळ मंगळवारी मध्यरात्री कामायनी व जनता एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना अपघात झाल्याने मध्य प्रदेशातून मुंबईकडे जाणाऱ्या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या अपघाताचा नाशिकच्या गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नसून भुसावळ-मुंबई मार्ग सुरळीत सुरू आहे. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या सुमारे चार तास विलंबाने धावत आहेत. मध्य प्रदेशातील हरदा रेल्वे स्थानकाच्या २० किलोमीटर अगोदर कालीमचक नदी रेल्वे पुलाचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. यामुळे मुंबई-वाराणसी-कामायनी एक्स्प्रेस ही मंगळवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास कालीमचक रेल्वे नदी पुलावरून जात असताना रेल्वे मार्ग उखडला. यामुळे पाच बोग्या या नदीत जाऊन पडल्या, तर काही डबे रेल्वे मार्गावरून घसरले. या अपघातानंतर काही वेळातच जबलपूर-मुंबई जनता एक्स्प्रेस ही पण त्याच ठिकाणी रेल्वे रुळावरून घसरून अपघातग्रस्त झाली. मध्यरात्री मुसळधार पावसामुळे मदतकार्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. या अपघातामुळे भुसावळ ते इटारसी रेल्वेसेवा बुधवारीदेखील ठप्प झालेली होती.या अपघातामुळे बुधवारी सुटणारी जबलपूर-मुंबई गरीबरथ व हबीबगंज-एलटीटी व उद्या गुरुवारी सुटणारी मुंबई-जबलपूर गरीबरथ व एलटीटी-हबीबगंज या चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून भुसावळमार्गे इटारसी जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या मुंबईवरून नाशिकरोड, भुसावळ, नागपूर मार्गे इटारसीहून पुढे जात व येत आहे. दरम्यान, नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी, गोदावरी, तपोवन एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या मार्गावर वारंवार काही दुर्घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासन व प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. इटारसी येथील रूट रिले इंटरलॉकिंग पॅनलला लागलेली आग, मुंबई-ठाणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली अ‍ॅटोमॅटीक सिग्नल यंत्रणा, इगतपुरी रेल्वेस्थानकात मालगाडीचे घसरलेले डबे अशा घटनांमुळे रेल्वे सेवेवर विपरीत परिणाम झाला होता. यामुळे अनेक रेल्वे काही दिवस रद्द ठेवून रेल्वे प्रशासनाला मोठ्या परिश्रमानंतर रेल्वेसेवा पूर्वपदावर आणता आली होती. आता पुन्हा मध्य प्रदेशातील हरदा रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे रेल्वे प्रशासन हादरून गेले आहे. किमान दोन-तीन दिवस रेल्वेसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी लागतील, असा अंदाज रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)